८ मार्च हा ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ (World Women’s Day) प्रामुख्याने स्त्रीवादाच्या दृष्टिकोनातून पाहिला जातो. सामाजिक, राजकीय व आर्थिक क्षेत्रांत स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करणारी विचारधारा म्हणजे ‘स्त्रीवाद’ होय. समानता हा शब्द जरी छोटा असला तरी त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. दुर्दैवाने, अजूनही संपूर्ण जगातच नव्हे, तर भारतातही स्त्री-पुरुष समानता पूर्णतः स्थापित झालेली दिसत नाही. या विषयाचा उहापोह करणारा रिता शेटीया यांचा हा विशेष लेख.
मानवी समाजाच्या हितासाठी आणि संरक्षणासाठी स्त्रीच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहणे आणि आजही समाजावर असलेल्या पुरुषप्रधान प्रभावाला कमी करणे हे स्त्रीवादाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या चळवळीची खरी सुरुवात ‘स्त्रीमुक्ती’ या विचारसरणीतून झाली. १९७५ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्ष’ म्हणून घोषित झाल्यानंतर, ‘स्त्रीमुक्ती’ हा शब्द भारत आणि महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचला. सुरुवातीला पाश्चात्त्य देशांतून आलेले फॅड म्हणून या विचाराकडे पाहिले गेले. ८ मार्च १९०५ रोजी वस्त्रउद्योगातील स्त्री कामगार आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्या, त्यांच्यावर गोळीबार झाला. नंतर १९१७ च्या राज्यक्रांतीनंतर कम्युनिस्टांनी ८ मार्चला ‘महिला दिन’ (World Women’s Day) म्हणून साजरा करण्याचे ठरविले. संयुक्त राष्ट्रसंघाने (UNO) १९७५ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्ष’ म्हणून जाहीर केल्यापासून ८ मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जात आहे.
दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पण यामागील मूळ उद्देश बाजूलाच राहतो किंवा त्यावर कुणीही चर्चा करत नाही. आपण समानतेबद्दल खूप बोलतो, पण ती प्रत्यक्षात दिसते का? स्त्रीवादी विचारधारेत अनेक प्रवाह आहेत: