Team MyPuneCity – चैतन्य संस्था आणि राजगुरुनगर नगरपरिषद ( Rajgurunagar) यांच्या संयुक्त विद्यमाने राजगुरुनगर मंडई येथे मोफत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात बचत गटातील गरजू महिलांनी बनवलेल्या कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले असून, महिला सक्षमीकरणासोबतच पर्यावरण रक्षण या दुहेरी उद्दिष्टांची पूर्तता करण्यात आली आहे संस्थेच्या संस्थापिका डॉ. सुधा कोठारी, श्रीमती रेखा श्रोत्रीय तसेच राजगुरुनगर नगरपरिषदेचे अध्यक्ष अंबादास गरकळ यांच्या हस्ते पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
PMPML : पीएमपीएमएलच्या पर्यटन बससेवा क्र. ८ व ९ चा शुभारंभ
प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे होणाऱ्या पर्यावरणीय ( Rajgurunagar) समस्यांचा विचार करता, चैतन्य संस्थेने लोकांना आवाहन केले आहे की त्यांनी आता कापडी पिशव्यांचा वापर करून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पुढाकार घ्यावा. चैतन्य संस्थेने पिंपरी मंडईतही अशाच प्रकारचा उपक्रम राबवला.जिथे प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या ग्राहकांना विनंती करून त्यांच्या पिशव्यांतील सामान कापडी पिशव्यांमध्ये टाकून देण्यात आले, ज्यामुळे लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण झाली.

चैतन्य संस्था महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असून ती भविष्यातही असे उपक्रम राबवत राहील, अशी ग्वाही देत सर्व नागरिकांना पर्यावरण रक्षणात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी संस्थेच्यावतीने करण्यात ( Rajgurunagar) आले.