Team My pune city – सरकारने हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर आज ठाकरे बंधूंनी(Raj Thackeray) एकत्र विजयी मेळावा साजरा केला. मुंबईतील वरळी येथील डोम सभागृहात या विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला.
या विजयी मेळाव्याला राज ठाकरेंनी संबोधित केले. यावेळी बोलतांनाराज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. राज म्हणाले , “आजचा मेळावा खरं तर शिवतीर्थावर व्हायला हवा होता. मैदान ओसंडून वाहिलं असतं. पण सध्या पाऊस असल्यामुळे मुंबईत अशा मोठ्या मेळाव्यासाठी जागा मिळत नाहीये. बाहेर जे उभे आहेत, त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आता (मेळावा) स्क्रीनवर आटपा, असे राज ठाकरे म्हणाले.
Pavana Dam : पवना धरणात दमदार पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ – साठा 71 % वर
Wari Sohala : आता आतुरता विठ्ठल दर्शनाची; आज पालखी सोहळा पंढरपूरात पोहचणार


पुठे राज हणाले “मी माझ्या मुलाखतीत म्हटलं होतं, त्यातूनच या गोष्टी सुरू झाल्या. कोणत्याही वादापेक्षा आणि कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, असं मी म्हटलं होतं. तब्बल २० वर्षांनंतर उद्धव आणि मी एका मंचावर येत आहोत. जे बाळासाहेबांनाही जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हा दोघांना एकत्र आणण्याचं ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं.”
आता सर्वच चॅनेलचे कॅमेरे इकडे लागले तिकडे लागले आहेत. आता संध्याकाळी सगळं सुरू होईल. काय वाटतं काय, दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती. कोणी कमी हसलं का? बोलतायत का? आपल्याकडे इतर विषय सोडून इतर गोष्टीत रस असतो अनेकांना असंही यावेळी राज म्हणाले. आजच्या मेळाव्यात कोणताही झेंडा नाही. मराठी हाच अजेंडा आहे. माझ्या मराठीकडे, महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने कुणी पाहायचं नाही, असा इशारा राज ठाकरेंनी यांनी यावेळी दिला.