Team MyPuneCity – कै. सीमा मोघे यांच्या स्मृतीदिनानिमित्त (Pune) हो २६ जून गुरुवार रोजी सदाशिव पेठेतील भावे प्राथमिकच्या सभागृहामध्ये ‘पाऊस मनी-मानसीचा’ कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी लेखिका व नाट्य कलावंत अरुंधती भालेराव यांना सीमा मोघे स्मृती कलासन्मान पुरस्कार देण्यात आला.
या कार्यक्रमाचं वेगळेपण त्याच्या अंगांगात भिनलेल्या सृजनशीलतेत होतं.पावसाचा कार्यक्रम म्हणजे पावसाच्या गाण्यांचा अनिर्बंध धो-धो वर्षाव असाच सर्वसाधारण अनुभव असतो. मग ‘आती क्या खंडाला’ पण त्यात येतं. पण कालचा कार्यक्रम कसा मातीतून सरसरुन वर येणा-या कोंभासारखा ताजा, टवटवीत होता. याचं कारण म्हणजे सुधीर मोघेंनी त्यांच्या नेहमीच्या पध्दतीप्रमाणे पावसाविषयीच्या अनेक कविता राज्याच्या वेगवेगळ्या भागतील कवींकडून मागवल्या होत्या, तर कार्यक्रमाची ख्याती सर्वदूर पोहोचल्यामुळे अनेक कवींनी त्या स्वतःहून पाठवल्या (Pune) होत्या.

Maval : आदिवासी विकासासाठी ठोस निर्णयांची बैठक; जिल्हाधिकारी कार्यालयात महाअभियानांचा आढावा
कविता वाचणा-या माधुरी दातार, अभय जोशी, संजय गंगाखेडकर यांची शब्दाशब्दावरची हुकुमत कविता संपेपर्यंत मानाला खिळवून ठेवत होती, तर नव्यापिढीचे दमदार गायक दत्तप्रसाद पांडे, मीनल गानू आणि नारायणी कुलकर्णी यांचं स्वरमाधुर्य श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत होतं.
वेदातल्या ऋचा, पर्जन्यसूक्त, कालिदासाच्या मेघदूतातले श्लोक, सूरदासांचं भजन, तुकोबा-नामदेवांचे पावसाविषयीचे अभंग, आणि चक्क लावणीही. जोडीला अंग शहारायला लावणा-या काही खट्याळ तर मनाला स्पर्शून जाणा-या काही लडिवाळ कविता या सर्व जलधारांचा सुंदर गोफ विणला होता तो सुधीर मोघे आणि निवेदन क्षेत्रात मातबर असलेल्या संध्या बरीदे रायते यांच्या निवेदनाने. त्यांच्या निवेदनाला त्यांच्या एन.एस.डी.तल्या साधनेची आणि संस्कृतच्या अध्ययनाची प्रभा लाभली (Pune) होती.