Team MyPuneCity –संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याने पुण्यातील दोन दिवसाच्या मुक्कामानंतर आज सकाळी सासवडच्या दिशेने प्रस्थान केले.दिवे घाटाची अवघड वाट सर केली.
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने टाळ मृदंगाच्या गजरात,ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात ,हरिनामाच्या भजनात दंग होत ही वाट पार केली. निसर्ग सौंदर्याने नटलेला, चढउतारांनी भरलेला नागमोडी हा घाट वारीचा महत्त्वाचा टप्पा आहे. लाखो वारकऱ्यांनी आज दिव्य घाटाचा अवघड मार्ग सर केला.घाटाचे रुंदीकरणाचे काम चालू असल्याने डोंगर फोडण्यात आले आहेत.यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासना कडून यंदा टेकडी वर जाण्यासाठी नागरिकांना मज्जाव केला आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षतेसाठी पालखी मार्गावर एनडीआरएफ चे जवान तैनात केले होते.
Pune: मंगला खाडिलकर यांना दुसरा कै. प्रकाश पायगुडे स्मृती पुरस्कार जाहीर
दि.२२ व दि.२३ असा दोन दिवस माऊलींची पालखी सासवड येथे मुक्कामी असणार आहे. दि.२४ रोजी सकाळी माऊलींचा आषाढी वारी पालखी सोहळा जेजुरी कडे प्रस्थान करेल.

