Team MyPuneCity –भारत आणि पाक यांच्यातील संबंध सध्या कमालीचे तणावपूर्ण आहे. दोन्ही देशांत शस्त्रसंधी झालेली असली तरीही अद्याप यांच्यातील तणाव पूर्णपणे मिटलेला नाही. ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशवासीयांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीवर नेमकं काय बोलणार आहे याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
Vinod Sutar : पिंपरी-चिंचवडमधील तबलावादक व संगीत शिक्षक विनोद सुतार यांचा अपघाती मृत्यू
पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी परदेश दौरा अर्धवट सोडून भारतात दाखल झाले होते. त्यानंतर मोदींनी अनेक बैठका घेतल्या होत्या. पंतप्रधान मोदी यांच्या केंद्रीय गृहराज्यमंत्री, संरक्षणंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, तिन्ही सेनादलाचे प्रमुख यांच्यासोबत अनेक महत्त्वाच्या बैठका पार पडल्या. बैठकांनंतरच भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. या सर्व घडामोडीं घडल्यानंतर आता पहिल्यांदाच मोदी देशाला संबोधित करणार आहेत.
ऑपरेशन सिंदूरविषयी लष्कराकडून माहिती
भारतीय लष्कराने पत्रकार परिषदा घेऊन ऑपरेशन सिंदूरची या आधी सविस्तर माहिती दिली आहे. आज भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांनी एकत्र येऊन ऑपरेशन सिंदूर कसे राबवले याची सविस्तर माहिती दिली. आज दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये चर्चा देखील होणार आहे. त्यातच आता पंतप्रधान मोदी आज रात्री जनतेशी सवांद साधणार आहेत . ते देशाला नेमकं काय सांगणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.