मानवता हिताय सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केले तरुणीचे मन परिवर्तन
Team MyPuneCity – बारावीच्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे मी आता नदीवर आत्महत्या करण्यासाठी जात असल्याचा फोन मुलीने आईला केला. रिझल्ट पाहण्यासाठी गेलेल्या मुलीचा अशा प्रकारे फोन आल्यामुळे आई पुरती हादरून गेली. बराच वेळ संपर्क केल्यानंतर आईने मुलीला गाठले आणि थेट पिंपरी पोलीस ठाण्यात आणले. पिंपरीतील (Pimpri) मानवता हिताय सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तरुणीचे मन परिवर्तन केले आणि तिचा आत्महत्येचा विचार डोक्यातून काढून टाकला.
बारावी सायन्स परीक्षा दिलेली १७ वर्षीय तरुणी रिझल्ट पाहण्यासाठी पिंपरीतील (Pimpri) कॉलेजमध्ये गेली होती. पुढे तिला वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते. मात्र, मात्र, अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने ती निराश झाली होती. या नैराश्यातूनच तिने आत्महत्येचा विचार केला. वडील नाहीत बहीण आणि आई नोकरी करून आपला सांभाळ करत आहे. त्यातच आपल्याला कमी गुण मिळाले म्हणून या तरुणी रडत होती.
Pune News : शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर
आपली मैत्रीण रडत असल्याचे पाहून अन्य एका मुलीने या तरुणीच्या आईला फोन केला. तेव्हा फोन घेऊन मी आता नदीवर आत्महत्या करायला जात असल्याचे तिने आईला सांगितले. रिझल्ट पाहण्यासाठी गेलेली मुलगी आत्महत्या करायला चालली म्हणल्यानंतर आईच्या पायाखालची जमीन सरकली.
नोकरी करत असलेल्या ठिकाणच्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने तिने मुलीला शोधले. मी आता घरी येणार नाही असे तरुणी म्हणत होती. त्यामुळे तिच्या आईने मुलीला थेट पिंपरी पोलीस ठाण्यात आणले. ही माहिती मानवता हिताय सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष धनराजसिंह चौधरी आणि उपाध्यक्षा नेहा रोकडे यांच्यापर्यंत पोहोचली. संस्थेची समुपदेशन टीम पिंपरी पोलीस ठाण्यात(Pimpri) दाखल झाली.
Maval : डोंगरावर फिरायला गेलेल्या चौघांवर मधमाश्यांचा हल्ला; एकाचा मृत्यू, दोघे जखमी
संस्थेच्या तज्ज्ञ समुपदेशकांनी तरुणीशी संवाद साधला. तिच्या मनातील भावनिक अस्वस्थतेचे मूळ समजून घेतले आणि तिला मानसिक आधार दिला. शिक्षणात अपयश म्हणजे आयुष्य अपयशी झालं असा समज चुकीचा आहे, हे तिला समजावून सांगितले. तिच्या आयुष्यात अनेक सकारात्मक संधी आहेत, हे भान देण्याचा प्रयत्न केला.
या साऱ्या संवादातून तिच्या मनातील निराशा दूर होऊ लागली. तिला आत्मभान येऊ लागले. त्यानंतर तिने आत्महत्येचा विचार सोडून दिला आणि आपल्या आईसोबत सुखरूप घरी परतली. या घटनेमुळे केवळ एक जीव वाचवला गेला नाही, तर एका कुटुंबाचा (Pimpri) उद्विग्न क्षणही टळला.
या संपूर्ण उपक्रमात पिंपरी पोलीस ठाण्याचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय घाडगे आणि फौजदार अनुजा राऊत यांनी संस्थेला सहकार्य केले. त्यांनी वेळेवर कृती करत तरुणीला सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना केल्या. पोलिसांनी संस्थेच्या तत्परतेचे कौतुक करत भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांना सहकार्याची ग्वाही दिली.
मानवता हिताय सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष धनराजसिंह चौधरी म्हणाले, “तरुणाई ही आपल्या देशाची ताकद आहे. त्यांना मानसिक आरोग्याच्या बाबतीत आधार देणे हे आपले कर्तव्य आहे. शिक्षणात अपयश आले तरी ते अंतिम नाही, हा संदेश आपण सातत्याने देत राहायला (Pimpri) हवा.