आणीबाणीतील लढवय्यांचा पिंपरी-चिंचवडमध्ये गौरव;भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वात लोकशाहीच्या संरक्षणाचा संकल्प
Team MyPuneCity -भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील ‘काळा अध्याय’ असलेल्या आणीबाणीत लोकशाही मूल्यांसाठी असीम त्याग (Pimpri) आणि संघर्ष करणाऱ्या मीसाबंदी व लढवय्यांचा ‘सन्मान सोहळा’ पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड येथील गोखले हॉल येथे मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात, आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी सर्वस्व पणाला लावलेल्या शूरवीरांना आदरांजली वाहण्यात आली.
MP Shrirang Barne : हिंजवडीसह सात गावे महापालिकेत घेण्याची हीच योग्य वेळ
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, भाजपाचे प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी यांनी आणीबाणीच्या काळावर अत्यंत कठोर शब्दांत भाष्य केले. “आणीबाणी म्हणजे इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा केलेला खून!” या शब्दांत त्यांनी तत्कालीन परिस्थितीवर घणाघाती टीका केली. कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात आणीबाणीच्या काळातील अनेक हृदयद्रावक प्रसंगांचे सविस्तर वर्णन केले. तत्कालीन शासनाच्या दडपशाहीचे आणि नागरिकांनी भोगलेल्या यातनांचे विदारक चित्र त्यांनी मांडले. लोकशाही स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या त्या कटू आठवणींना उजाळा देताना, वारंवार राज्यघटनेत बदल करण्याचे पाप इंदिरा गांधी यांच्या सहका-यांनी केल्याचे सांगत इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने ६० ते ७० वर्षांच्या काळात जनतेचे मूलभूत हक्क कसे हिरावून घेतले, यावर तीव्र शब्दांत टीका केली. कुलकर्णी यांनी लोकशाही मूल्यांसाठी संघर्ष करणाऱ्या आणि तुरुंगवास भोगलेल्या लढवय्यांच्या त्यागाचे स्मरण केले. तसेच, लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध राहण्याची गरज असल्याचे त्यांनी (Pimpri) अधोरेखित केले.

Talwade Murder : अनैतिक संबंधातून दुहेरी खून, आरोपीला अटक
या प्रेरणादायी सोहळ्याला भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरी चिंचवड जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, ॲड. एस. बी. चांडक, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, भाजपा सरचिटणीस विजय उर्फ शितल शिंदे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पलांडे, नगरसेवक सूरेश भोईर, नगरसेविका उषा मुंढे, माधुरी कुलकर्णी, माजी नगरसेवक राजू दुर्गे, सह संयोजक बिभीषण चौधरी, कैलास सानप, रविंद्र देशपांडे, भाजपा मंडल अध्यक्ष हर्षद नढे, गणेश ढोरे, मोहन राऊत, मंगेश धाडगे, मंडल अध्यक्षा अनिता वाळुंजकर, देवीदास पाटील, विठठल भोईर, युवा मोर्चा पदाधिकारी अजित कुलथे, मधुकर बच्चे, ऍड. गोरक्षनाथ झोळ, प्रदीप सायकर, राजू मासूळकर, मनोज ब्राम्हणकर, नामदेव पवार, दत्तात्रय ढगे, सूरेश शिरोडे, मनिषा शिंदे, नंदू भोगले, माणिकराव अहिरराव, संदेश काटे, शुभम नखाते, सतीश नागरगोजे, खंडूदेव कठारे, अतुल कांबळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी, आणीबाणीच्या काळात लोकशाहीसाठी संघर्ष केलेल्या अनेक मीसाबंदी व त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. सन्मानित करण्यात आलेल्या लढवय्यांमध्ये दादा ढवाण, माजी नगरसेवक प्रल्हाद जाधव, भरत देशपांडे, मधुसूदन जाधव, जयंत वैद्य, भालचंद्र देशपांडे, सतीश बोरकर, शरद खांबे, प्रकाश डांगे, महादेव वाठारकर, शंकर किल्लेदार, भास्कर भदाणे, धोंडीराज ओक, अशोक काची, प्रशांत हरहरे, गोविंद जेस्ते, श्रीकृष्ण काणे, रघुनाथ कुंभार, सुभाष बोधे, अविनाश खेडकर, पांडुरंग भांडेकर, दीपक दिवेकर, आणि विजयसिंह रजपूत यांचा समावेश (Pimpri) होता.
याशिवाय, कै. रवींद्र नवाथे यांच्या पत्नी डॉ. शैलजा नवाथे, कै. तुकाराम जवळकर यांच्या पत्नी छबुबाई जवळकर, कै. रामचंद्र फुगे यांच्या पत्नी श्रीमती रंजना रामचंद्र फुगे, कै. गोविंद पवार यांच्या पत्नी श्रीमती सुधामती पवार, कै. विष्णू सुतार यांच्या पत्नी श्रीमती जयश्री सुतार, आणि कै. शैलजा ताम्हणकर यांचे पुत्र, कै. रमण मुनगेकर यांच्या पत्नी अंजली मुनगेकर, यांचाही या सोहळ्यात सन्मान करण्यात आला.
भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी, या सर्व मीसाबंदी आणि लोकशाहीच्या रक्षक लढवय्यांच्या शौर्याला आणि त्यागाला शतशः प्रणाम केला. लोकशाहीच्या रक्षणासाठी भारतीय जनता पार्टी सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट केले. हा सोहळा केवळ सन्मानाचा नव्हता, तर लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासाठी आणि भविष्यात अशा हुकूमशाही प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी दृढ संकल्प करण्याचा एक प्रेरणादायी क्षण ठरल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बिभीषण चौधरी यांनी केले. सुत्रसंचालन मोरेश्वर शेडगे तर आभार अजित कुलथे यांनी (Pimpri) मांडले.