situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri : पिंपरी चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एन्ट्री-एक्झीट बदलण्याची मागणी

Published On:
Pimpri
---Advertisement---

Team MyPuneCity – पिंपरी चौकासह चिंचवड (Pimpri) परिसरातील सततच्या वाहतूक कोंडीला कायमस्वरूपी उतारा मिळवण्यासाठी वाहतूक मार्गात तांत्रिक बदल करणे गरजेचे आहे, असे मत चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी वाहतूक पोलीस आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वाहतूक विभागाकडे ठोस उपाययोजनेची मागणी केली आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर निगडीहून पुण्याच्या दिशेने जाताना, डी मार्टजवळील सर्व्हिस रोडपासून मुख्य रस्त्यावर (स्पीड रोड) चढण्यासाठी एक एन्ट्री पॉईंट आहे. तर तनिष्क शोरूमजवळ मुख्य रस्त्याहून सर्व्हिस रोडवर येण्यासाठी एक्झीट पॉईंट आहे. सध्या ही रचना पिंपरी चौक ते आंबेडकर चौकदरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहे.

Alandi : रस्त्यावर दारूचे बॉक्स पडले; दारूच्या बाटल्या पळवण्यासाठी लोकांची धावपळ

राजेश अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, निगडीहून ऑटो क्लस्टर, सायन्स पार्क, एम्पायर स्क्वेअर, कोहिनूर वर्ल्ड टॉवर यांसारख्या वाणिज्यिक केंद्रांकडे जाणाऱ्या वाहनांना स्पीड रोडवरून काळभोर नगर एक्झीट घेतल्यानंतर दोन्ही चौकात अडकत अडकत पुढे जावे(Pimpri) लागते. यामुळे वाहनांचा प्रवास वेळखाऊ आणि त्रासदायक ठरत आहे.

त्याचप्रमाणे, या व्यावसायिक भागांतून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना देखील अहिल्यादेवी चौक (फिनोलेक्स चौक) व आंबेडकर चौकामध्ये वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. परिणामी, संपूर्ण मार्गावर प्रचंड वाहतूक गती मंदावते.

या पार्श्वभूमीवर, अग्रवाल यांनी एक अभिनव प्रस्ताव मांडला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, डी मार्टजवळ सध्या अस्तित्वात असलेल्या एन्ट्री पॉईंटऐवजी तिथेच एक्झीट तयार करावी आणि तनिष्क शोरूमजवळ नवीन एन्ट्री पॉईंट उपलब्ध करून द्यावा. अशा बदलामुळे वाहनांचा प्रवाह अधिक सुलभ होईल आणि चारही प्रमुख चौकांवरील वाहतूक दाटी जवळपास ६० टक्क्यांनी कमी होईल, असा दावा त्यांनी केला आहे.

ही सूचना राबविण्यासाठी वाहतूक पोलीस व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वाहतूक विभागाने तत्काळ कृती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मार्गदर्शनानुसार सुधारणा केल्यास नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होईल आणि शहरातील वाहतूक व्यवस्थेवरचा ताणही कमी होईल, असे मत अनेक नागरिकांनीही व्यक्त केले (Pimpri) आहे.

Follow Us On