सामान्य प्रवाशांचा संताप; लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेबाबत सवाल
Team MyPuneCity – पिंपरी-चिंचवड ते राजगुरुनगरदरम्यानचा दररोजचा प्रवास हा आता केवळ शारीरिक नाही तर मानसिक छळ ठरत आहे. अवघ्या ३० ते ४० मिनिटांत पार होऊ शकणारा हा मार्ग सध्या दीड ते दोन तासांचा होऊन बसला असून, यामुळे रोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत ( Pimpri-Chinchwad) आहे.
सदर मार्गावर रस्त्यांची दुरवस्था, वाहतुकीतील गोंधळ, अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक सुविधा, बेसुमार खड्डे आणि वाहतूक नियंत्रणाचा अभाव यामुळे प्रवासी वैतागले आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही लोकप्रतिनिधींकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
राजगुरुनगरला नोकरीसाठी दररोज जाणाऱ्या सचिन बोधनी या वाहनचालकाने आपल्या अनुभवाची सोशल मीडियावर भावनिक मांडणी केली आहे. “प्रवासादरम्यान धूळ, उकाडा, हॉर्नचा आवाज, राग आणि वैफल्य यांचा ताण इतका वाढतो की, मानसिक तणाव निर्माण होतो,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. ते पुढे म्हणतात, “मी स्वतः मानसिक आरोग्य तज्ज्ञ आहे, पण या प्रवासामुळे ( Pimpri-Chinchwad) अनेकदा स्वतःलाच तणावग्रस्त वाटते.”
Baby version trend : Ghibli नंतर आता सुरू झालाय बेबी वर्जन ट्रेंड
या मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना वेळेचा अपव्यय, शारीरिक दमणूक आणि मानसिक थकवा यांचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांच्या मते, खासदार, आमदार वा स्थानिक नगरसेवक यांना या समस्येबाबत काहीच देणंघेणं नाही. “लाल दिव्यांच्या गाड्या, सायरन वाजवत वाट मोकळी करणं सोपं आहे, पण सामान्य माणसासारखं या रस्त्याने रोज प्रवास करावा लागला, तर कदाचित त्यांच्या मनात थोडी तरी करुणा निर्माण होईल,” असा उपरोधिक सवालही बोधनी यांनी उपस्थित केला आहे.
या गंभीर समस्येकडे प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा येत्या काळात प्रवासी संघटनांकडून आंदोलनात्मक पावले उचलली जाऊ शकतात, अशी सूचनाही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ( Pimpri-Chinchwad) दिली आहे.