situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PCMC: पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या वाढली तरी नगरसेवक 128

Published On:
PCMC Election
---Advertisement---

Team MyPuneCity -पिंपरी, पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक येत्या चार ते पाच महिन्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी सन 2011 ची लोकसंख्या विचारात घेतली जाणार आहे. त्यानुसार प्रभागांची रचना केली जाणार आहे. मात्र, गेल्या पंधरा वर्षांत शहराची लोकसंख्या वाढली असून ती 30 लाखांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे मतदारांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. सन 2011 च्या जणगणनेनुसारच प्रभागांची रचना केली जाणार असल्याने लोकसंख्या वाढली असली तरी नगरसेवकांची संख्या मात्र तेवढीच राहणार आहे. प्रभागरचना तयार होऊन प्रत्यक्ष निवडणुकीचे कामकाज 2 महिन्यानंतर सुरू होईल, असे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

महापालिकेची स्थापना 11 ऑक्टोबर 1982 ला झाली. त्यानंतर 26 मार्च 1986 पर्यंत महापालिकेवर प्रशासक होते. 2 मार्च 1986 साली 60 वॉर्डसाठी महापालिकेची निवडणूक झाली. त्यानंतर 1992 व 1997 ला एक वॉर्ड याप्रमाणे निवडणूक झाली. फेब्रुवारी 2002 मध्ये तीन सदस्यीय पद्धतीने निवडणुका झाल्या. यावेळी 35 प्रभाग होते. त्यानंतर दोन व चार सदस्य पद्धतीने निवडणुका झाल्या.

Pune : मूल्यात्मक व्यापक समाजकल्याण व्यवस्था म्हणजे खरे करिअर -समर नखाते

कोरोना महामारीमुळे सन 2021 ची जनगणना झाली नाही. सन 2011 साली शहराची लोकसंख्या 17 लाख 27 हजार 359 होती. त्यामध्ये पुरुष 9 लाख 45 हजार 943 व महिलांची संख्या 7 लाख 83 हजार 406 होती. गेल्या पंधरा वर्षात ही लोकसंख्या सुमारे 15 लाखांने वाढून 32 लाखांच्या जवळ गेली आहे. कोरोनामुळे सन 2021 ची जनगणना झाली नसल्याने सन 2011 च्या जनगणनेनुसारच प्रभागांची रचना करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रभागाची संख्या 32 राहणार असून, नगरसेवकांची संख्या 128 असेल.

महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करून राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी महापालिका आयुक्त सादर करतील. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकार्‍यांवर असणार आहे. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचना आयुक्त प्रसिध्द करतील. त्यावर येणार्‍या हरकती व सुचनावर राज्य सरकारने प्राधिकृत केलेल्या अधिकार्‍यांमार्फत सुनावणी घेण्यात येणार आहे. सुनावणीनंतर अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोग मान्यता देईल. त्यानंतर महापालिका आयुक्त अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करतील. त्यासाठी किमान 2 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीचे कामकाज सुरू होईल, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

Follow Us On