मावळ ऑनलाईन – “अणुबॉम्बची धमकी देऊन आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही, गरज पडल्यास ते पुन्हा सुरू करू,” असा स्पष्ट आणि कठोर इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात दिला.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर प्रथमच बोलताना त्यांनी (Narendra Modi) पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावरून चांगलेच धारेवर धरले. “यापुढे दहशतवाद आणि व्यापार एकत्र चालणार नाही, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही. पाकिस्तानसोबत चर्चा झाली तर ती फक्त पाकव्याप्त काश्मीर आणि दहशतवादावरच होईल,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
SSC Result : दहावीचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर होणार; निकालासाठी ९ अधिकृत संकेतस्थळांची सुविधा
पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे:
- ऑपरेशन सिंदूर स्थगित, संपलेले नाही: “ऑपरेशन सिंदूरची कारवाई फक्त स्थगित केली आहे, पण थांबवली नाही. पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणं थांबवलं नाही, तर भारत पूर्ण शक्तीने हल्ला करेल.”
- दहशतवादी हल्ल्यांना जशास तसे उत्तर: “भारतावर यापुढे दहशतवादी हल्ला झाला, तर जशास तसे उत्तर दिले जाईल. दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले जातील.”
- अणुबॉम्बच्या धमकीला घाबरणार नाही: “पाकिस्तानच्या अणुबॉम्बच्या धमकीला भारत घाबरणार नाही. दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांवर जोरदार कारवाई होईल.”
- दहशतवादी आणि त्यांना पोसणारे सारखेच: “दहशतवादी आणि त्यांना पोसणाऱ्यांना वेगवेगळ्या दृष्टीने पाहणार नाही. दोघांवरही कारवाई होईल.”
- दहशतवाद आणि व्यापार एकत्र नाही: “यापुढे व्यापार आणि दहशतवाद एकत्र होणार नाही. रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही.”
- बहिणींच्या कुंकवाचा बदला: “ज्यांनी आमच्या बहिणींचे कुंकू पुसले, त्यांचा बदला भारताने घेतला.”
- दहशतवादी तळ उद्ध्वस्त: “भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ अचूकरित्या उद्ध्वस्त केले. भारताचा हा मोठा निर्णय पाहून दहशतवादीही हादरले.”
- ‘मेड इन इंडिया’ शस्त्रांची ताकद: “भारतीय बनावटीच्या शस्त्रांनी हवाई हल्ले आणि पर्वतीय प्रदेशात आपली ताकद सिद्ध केली.”
- शस्त्रसंधीची याचना: “भारताच्या जोरदार हल्ल्यांमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने शस्त्रसंधीची याचना केली. भारताने आपले लक्ष्य साध्य केल्यानंतर शस्त्रसंधी केली.”
- पाकव्याप्त काश्मीरवर चर्चा: “यापुढे पाकिस्तानसोबत फक्त दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरवरच चर्चा होईल.”
Chinchwad Murder : अल्पवयीन तरुणीच्या खुनप्रकरणी दोघा आरोपींना २४ तासात अटक
ऑपरेशन सिंदूरची माहिती:
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. यापुढेही भारत कारवाई करण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा मोदींनी दिला. भारतीय लष्कराला पूर्ण मोकळीक दिल्यानंतर लष्कराने ही कारवाई केली. भारताच्या जबरदस्त हल्ल्यानंतर पाकिस्तान जगभर मदतीची याचना करत होता. त्यानंतर 10 मे रोजी पाकिस्तानच्या डीजीएमओने शस्त्रसंधीसाठी फोन केला. तोपर्यंत भारतीय लष्कराने आपले काम पूर्ण केले होते, असे मोदींनी (Narendra Modi) सांगितले.