Team MyPuneCity – पावसानंतर वीजपुरवठा खंडित झाल्याने दुरुस्तीच्या कामादरम्यान कर्मचाऱ्याला विजेचा धक्का बसला. मोशी येथील गंधर्वनगरी येथे १५ मे रोजी सायंकाळी ही घटना घडली. जखमी कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान त्याचा शनिवारी (१७ मे) पहाटे मृत्यू झाला.
तुकाराम नामदेवराव कांबळे (४०, सध्या रा. पेठ क्रमांक ४, मोशी प्राधिकरण, मूळ रा. सातेफळ, जि. यवतमाळ) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तुकाराम कांबळे हे ठेकेदाराकडे कामाला होते. पावसामुळे गंधर्वनगरी येथील वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यावेळी तुकाराम कांबळे हे खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना त्यांना विजेचा धक्का लागून ते खाली कोसळले. त्यांना चिंचवड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शनिवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
Chinchwad: पालिकेकडे परवानगीचा कागद पूर थांबवू शकणार नाही- राजेंद्र सिंह
तुकाराम कांबळे यांच्या मागे पत्नी अरुणा, मुलगा अनुराग आणि मुलगी मेरी असा परिवार आहे. कांबळे कुटुंब भाडेतत्वावरील घरात राहत असून, आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे.