Team My pune city – “मराठा समाजाची सद्यपरिस्थिती (Maratha community) नाजूक आहे. त्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू करण्याबरोबरच 10 हजार कोटी रुपयांचे आर्थिक विकास महामंडळ तात्काळ कार्यान्वित करावे, अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेने केली आहे. काळेवाडी येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. तत्पूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना नानासाहेब जावळे पाटील यांनी आपली भूमिका मांडली.
यावेळी केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील, केंद्रिय सहकार्याध्यक्ष (Maratha community) भिमराव मराठे, प्रदेश महासचिव मनोज मोरे, पश्चिम महाराष्ट्र मच्छिंद्र चिंचोळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन लिमकर, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष राम सुर्यवंशी, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख आशिष खंडेलवाल, सहकार्यध्यक्ष प्रेम भुरे, पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षय बोडके, पुणे जिल्हा अल्पसंख्याक सर्फराज शेख, पुणे जिल्हा शिक्षक आघाडी प्रशांत फड, हर्षद नढे आदी उपस्थित होते.
Pimpri Chichwad Crime News 19 August 2025 : नोकरीचे आमिष दाखवून ७७.६२ लाखांची फसवणूक
नानासाहेब जावळे म्हणाले, मराठा समाजाच्या अन्य मागण्यांबाबतही तातडीने ठोस निर्णय घ्यावेत. मराठा समाज अद्यापही शांत आणि संयमी भूमिकेत आहे. मात्र आमच्या(Maratha community) संयमाचा कडेलोट होण्याची वाट सरकारने पाहू नये. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात बोलताना जावळे पाटील म्हणाले की, “सध्या हवामानाच्या लहरीपणामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारने त्वरित शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, अखिल भारतीय छावा संघटनेने यापूर्वीही मराठा समाजाच्या हक्कांसाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक आंदोलने केली आहेत. नानासाहेब जावळे पाटील यांनी यावेळी सर्व सामाजिक घटकांना एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध लढण्याचे आवाहन केले. “गेल्या 30 वर्षांपासून अखिल भारतीय छावा संघटना शेतकरी आणि सामान्य माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढत आहे. आणि त्यांच्या न्यायासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू,” असे त्यांनी यावेळी सांगितले.
ज्ञानोबा-तुकोबारायांसारख्या संतांची भूमी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात कोणत्याही गैरप्रकारांना थारा मिळू नये. प्रशासनाने याबाबत कारवाई (Maratha community) करावी.