situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Maharashtra Day: ‘जय जय महाराष्ट्र माझा‌’; दुबईत प्रथमच साजरा झाला महाराष्ट्र दिन

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –मराठी प्रोफेशनल्सच्यावतीने दुबईमध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राच्या शौर्य परंपरेबरोबरच महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे आणि वारशाचे दर्शन सांस्कृतिक कार्यक्रमातून स्थानिक मराठी नागरिकांनी घडविले. महाराष्ट्र गीताबरोबरच यूएई आणि भारताचे राष्ट्रगीत सादर करून एकात्मतेचा संदेश देण्यात आला.

दुबई सरकारमध्ये उच्चपदस्थ अधिकारी असलेले आणि दुबई प्रोफेशनल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ जायबा पाटील यांच्या पुढाकारातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य सचिन ईटकर यांनी महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास विशद केला. रविवार, दि. 4 मे रोजी आयोजित करण्यात आला होता.

महाराष्ट्रातील अनेक नागरिक उद्योग-व्यवसायानिमित्त दुबईत स्थायिक झाले आहेत. या पूर्वी तेथे कधीही तेथे महाराष्ट्र दिन साजरा झाला नव्हता. मूळ बेळगावचे असलेले सोमनाथ पाटील यांनी महाराष्ट्र दिन साजरा करण्याची संकल्पना तेथील मराठी नागरिकांसमोर मांडल्यानंतर मराठीजनांनी त्यास उत्साहाने पाठींबा दिला. या कार्यक्रमात दुबईतील जवळपास 200 पेक्षा जास्त कुटुंबांसह महाराष्ट्रातील अनेक मान्यवर सहभागी सहभागी झाले होते.

Chinchwad Fraud News : सरकारी ठेकेदार असल्याचे सांगत दीड कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन स्थानिक नागरिकांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून घडविले. गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करत भजन, लोकगीते, कोळीगीते, लावणी या प्रसंगी सादर करण्यात आली.

सचिन ईटकर यांनी महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मराठी बांधवांचे बलिदान आणि भविष्यातील महाराष्ट्रासमोरील आव्हाने याविषयी विस्तृत विवेचन केले. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर राज्याची झालेली प्रगती, औद्योगिक-आर्थिक विकास, साहित्य, संस्कृती, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राने केलेल्या प्रगतीविषयी ईटकर यांनी अवगत केले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दुबईत स्थायिक झालेल्या मराठी नागरिकांनी महाराष्ट्राचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कार्यरत राहून महाराष्ट्राचा गौरव वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.

दुबईत दरवर्षी महाराष्ट्र दिन साजरा केला जाणार असल्याचे सांगून सोमनाथ पाटील म्हणाले, ज्या गावातून आम्ही येथे आलो आहोत त्या गावातील तरुणांचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले आहे.

सोमनाथ पाटील, रवींद्र देशमुख, इंद्रजीत शिंदे, अतुल विसपुते, रवींद्र देसाई, नारायण तिवारी, सनी सुतार, निखिल जोशी, श्री. चंद्रशेखर, श्री. जाधव, शिवाजी पाटील, विठोबा अहेर, अमित भोसले, शेखर दिवाडकर, नितीन जाधव, सदानंद भोयर, विजय कदम, नेमका जोशी यांनी संयोजन केले.

Follow Us On