Team My Pune City – खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) सांमुठा नदीत आणि चासकमान धरणातून भीमा नदीत केला जाणारा विसर्ग सोमवारी (29 जुलै) सकाळी कमी करण्यात आला आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने हा विसर्ग कमी केला असून पाण्याच्या येव्यानुसार हा विसर्ग कमी जास्त केला जाणार आहे.
Chinchwad fire News : चिंचवडगाव येथे हेरिटेज प्लाझा कॉम्प्लेक्स मधील दुकानाला आग
खडकवासला धरणाच्या (Khadakwasla Dam) सां सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सोमवारी सकाळपर्यंत 28 हजार 662 क्युसेक्स विसर्ग सुरू होता. हा विसर्ग सोमवारी सकाळी 9 वाजता कमी करून 24 हजार 772 क्यूसेक्स करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण आणि पाण्याचा येवा यानुसार बदल केला जाणार असल्याचे मुठा कालवे पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी सांगितले.
Rashi Bhavishya 29 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तसेच धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी सांडवावरून भिमा नदी पात्रामध्ये सुरू असलेल्या 4300 क्युसेक विसर्ग कमी करून सोमवारी सकाळी 8:30 वाजता 2040 क्युसेक करण्यात आला आहे. तसेच अतिवाही द्वारे 400 क्युसेक असा एकूण 2440 क्युसेक विसर्ग नदीपात्रात मध्ये सुरू असल्याचे चासकमान पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मो. ता. जाधवर यांनी (Khadakwasla Dam) सांगितले.