Team My Pune City –पुणे शहरातील मॉडेल कॉलनी परिसरातील (Jain boarding controversy) जैन समाजाच्या जमिनीच्या विक्री व्यवहारामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्यावर सातत्याने आरोप करत नवनवीन माहिती समोर आणली आहे.
PMC : विमाननगर आणि भवानी पेठमध्ये यांत्रिक कचरा संकलन यशस्वी; आता संपूर्ण पुण्यात विस्तार
धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत मोहोळ यांच्यावर टीका करत म्हटले की, “अर्धा तास बोलले, पण जैन मंदिर वाचवण्याचा उल्लेखही केला नाही.” यावर प्रत्युत्तर देताना मोहोळ यांनी स्पष्ट केले की, त्यांनी यापूर्वीच स्पष्टीकरण दिले असून सध्याची टीका ही राजकीय नैराश्यातून होत आहे. त्यांनी धंगेकर यांना वैफल्यग्रस्त म्हणत टोला लगावला.
Shri Kshetra Bhandara: श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायथ्याला होणार यावर्षीचा माघ शुद्ध दशमी सोहळा
या वादात एक जुना व्हिडीओही चर्चेत आला आहे, ज्यामध्ये मोहोळ बांधकाम व्यावसायिक विशाल गोखले यांच्यासोबत दिसत आहेत. मोहोळ यांनी स्पष्ट केले की, गोखले हे त्यांचे मित्र होते, आहेत आणि राहतील. व्हिडीओ पाच वर्षांपूर्वीचा असून त्याचा सध्याच्या परिस्थितीशी काही संबंध नाही, असे त्यांनी सांगितले.
धंगेकर यांनी आरोप केला की, जैन बोर्डिंगच्या जमिनीची विक्री बेकायदेशीरपणे झाली असून त्यात मोहोळ यांचा सहभाग आहे. धर्मदाय आयुक्तांनी या व्यवहारावर स्थगिती आदेश दिला असून आतापर्यंत झालेले व्यवहार जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले (Jain boarding controversy) आहेत.
याशिवाय, धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली होती, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज दिली होती. आता मोहोळ यांच्यावर टीका सुरू झाली आहे. यावर मोहोळ म्हणाले की, हे त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रकरण आहे आणि त्यावर बोलणे योग्य नाही.
बालेवाडीतील एका बांधकाम प्रकल्पासंदर्भातही आरोप झाले (Jain boarding controversy) आहेत.
धंगेकर यांनी सांगितले की, मोहोळ यांनी महापौर असताना त्यांच्या प्रकल्पाचे काम थांबवले आणि त्यामुळे आर्थिक नुकसान झाले. यावर मोहोळ यांनी उत्तर दिले की, त्या वेळी नागरिकांच्या तक्रारीनुसार प्रशासनानेच काम थांबवण्याचे आदेश दिले होते. हे प्रकरण पाच वर्षांपूर्वीचे असून आता पुणे महापालिका प्रशासनच यावर उत्तर देईल, असे त्यांनी स्पष्ट केले.या संपूर्ण वादातून पुणे शहरातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका (Jain boarding controversy) सुरू आहे.
.