Team MyPuneCity – १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, अखेर विराट कोहलीच्या स्वप्नांची पूर्ती झाली. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) २०२५ आयपीएलच्या अंतिम सामन्यात (IPL Final 2025) पंजाब किंग्जचा अवघ्या ६ धावांनी पराभव करत आपले पहिलेवहिले विजेतेपद पटकावले. सामन्यानंतर विराट कोहली भावनांच्या भरात अश्रू ढाळताना दिसला. चाहत्यांसाठी आणि संघासाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला.
विराट कोहलीने ३५ चेंडूत ४३ धावा केल्या, पण त्याच्या ‘स्लगिश’ खेळामुळे RCB ची धावसंख्या २०० पर्यंत पोहोचू शकली नाही. संघाने २० षटकात १९०/९ धावा केल्या. अर्शदीप सिंग (३/४०) आणि काईल जेमिसन (३/४८) यांनी पंजाबकडून शानदार मारा केला. पंजाबने विजयासाठी (IPL Final 2025) प्रयत्नांची पराकाष्ठा केली. विशेषतः शेवटच्या षटकात शशांक सिंगने २२ धावा खेचून काढल्या, मात्र २९ धावांची गरज असताना पंजाब फक्त १८४/७ पर्यंतच मजल मारू शकला.

पहिल्या डावात (IPL Final 2025) विराटने सुरुवातीला संयमित खेळ केला. पण जेमिसनने फिल सॉल्टला दुसऱ्याच षटकात बाद करत पंजाबला पहिला झटका दिला. युझवेंद्र चहलने मयंक अगरवालला (२४) बाद करत RCB च्या धावगतीला खिंडार घातले. रजत पाटीदारने काही झंझावती फटके मारून धावसंख्येला गती दिली, पण अर्शदीपने त्याला बाद करून संघाचे आव्हान पुन्हा कमी केले.
Shiva Srushti : ६ जूनपासून शिवसृष्टी पाहण्यासाठीची नोंदणी होणार केवळ ऑनलाईन पद्धतीने
दुसऱ्या डावात पंजाबची सुरुवात झपाट्याने झाली. प्रियंश आर्य आणि प्रभसिमरन सिंगने फक्त ५ षटकांत ४३ धावा फटकावत RCB वर दडपण टाकले. पण जोश हॅझलवूडने प्रियंशला झेलबाद करून RCB ला मोलाचा ब्रेकथ्रू दिला. पुढे क्रुनाल पांड्याने जोश इंग्लिसचा (३९) बळी घेत पंजाबला मोठा झटका दिला.
त्यानंतर भुवनेश्वर कुमारने १७व्या षटकात नेहल वधेरा आणि मार्कस स्टॉइनिस या दोघांना झटपट बाद करत सामन्याचे (IPL Final 2025) पारडे RCB च्या बाजूने झुकवले. रोमारीयो शेफर्डने पंजाबचे कर्णधार श्रेयस अय्यरला केवळ १ धावेवर बाद केले. जरी शशांक सिंगने शेवटच्या षटकात आक्रमक प्रयत्न केला, तरी पंजाबला विजयी रेष पार करता आली नाही.
या ऐतिहासिक विजयामुळे विराट कोहलीचा “IPL ट्रॉफी”चा (IPL Final 2025) अनेक वर्षांचा ध्यास अखेर पूर्ण झाला. सामन्यानंतर पत्नी अनुष्का शर्माची डोळ्यांत पाणी आलेली प्रतिक्रिया, विराटच्या भावनांच्या उफाळाची साक्ष देणारी होती.
RCB चा संघ, कोहलीच्या मार्गदर्शनाखाली, अखेर T20 क्रिकेटमधील सर्वोच्च सन्मान पटकावण्यात यशस्वी झाला. हा विजय केवळ क्रिकेटचा नव्हे, तर विश्वास, चिकाटी आणि संघनिष्ठेचा विजय ठरला.
RCB १९०/९ (२० षटके)
(विराट कोहली ४३, अर्शदीप सिंग ३/४०, काईल जेमिसन ३/४८)
PBKS १८४/७ (२० षटके)
(शशांक सिंग २२*, भुवनेश्वर कुमार २ बळी)
असे होते दोन्ही संघांची अंतिम 11 :
🔴 RCB: फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अगरवाल, रजत पाटीदार (क.), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टी.), रोमारीयो शेफर्ड, क्रुनाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाळ, जोश हॅझलवूड.
🟡 PBKS: प्रियंश आर्य, जोश इंग्लिस (यष्टी.), श्रेयस अय्यर (क.), नेहल वधेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, अझमतुल्ला ओमरजई, काईल जेमिसन, विजयकुमार वैशाक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.