Team MyPuneCity – साहित्य, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात आपल्या बहुपेडी योगदानाने लौकिक मिळवलेल्या ज्येष्ठ साहित्यिक व कवी डॉ. पद्मिनी कराड (वय ७१) यांचे ९ जून २०२५ रोजी पहाटे ४ वाजता श्रीक्षेत्र देहू येथे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पिंपरी-चिंचवडसह राज्यातील साहित्यिक, सामाजिक व राजकीय ( Dr. Padmini Karad) क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
डॉ. पद्मिनी कराड या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आजीव सभासद होत्या आणि काही काळ पिंपरी-चिंचवड शाखेच्या पदाधिकारी देखील राहिल्या. त्यांचा जन्म ७ डिसेंबर १९५४ रोजी बीड जिल्ह्यातील पुरोगामी विचारांच्या शेतकरी कुटुंबात झाला. बीड येथेच त्यांचे बालपण आणि शालेय शिक्षण झाले, तर वैद्यकीय शिक्षण नांदेड येथे पूर्ण करून त्यांनी बीडहून पिंपरी-चिंचवड येथे वैद्यकीय व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतर ( Dr. Padmini Karad) केले.
Pune Accident News : पुण्यात दुचाकीवरून जाणार्या महिलेला ट्रक चालकाने चिरडले
त्यांचे साहित्य हे स्वानुभवप्रधान, ग्रामीण जीवनाच्या वास्तवाशी निगडित आणि शेतीमातीच्या नात्याशी जोडलेले होते. त्यांच्या पाच कवितासंग्रहांचे प्रकाशन झाले असून, आत्मचरित्रपर कथासंग्रह लवकरच प्रकाशित होणार आहे. साहित्य लेखनाबाबत त्यांच्या सशक्त शैलीला विविध मान्यवर पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. पहिला राष्ट्रीय बंधुता पुरस्कार मिळवणाऱ्या त्या साहित्यिक होत्या. “पहाट” या काव्यवाचन समूहाच्या त्या सक्रीय सदस्य होत्या आणि राज्यभर काव्यवाचनाचे अनेक कार्यक्रम त्यांनी केले होते. त्यांच्या काही कविता संगीतकार मधु जोशी यांनी सुरेल स्वरबद्ध ( Dr. Padmini Karad) केल्या.
साहित्यिकतेबरोबरच वैद्यकीय क्षेत्रातही त्यांचा भरीव ठसा होता. त्या प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. शिवाजीराव कराड यांच्या पत्नी असून, पंकज कराड, शिल्पा आणि डॉ. सायली कराड यांच्या त्या मातोश्री होत्या.
राजकीय व सामाजिक क्षेत्रातही डॉ. कराड यांची उल्लेखनीय भूमिका होती. भारतीय जनता पार्टीच्या त्या सक्रिय सदस्य होत्या. आणीबाणीच्या काळात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासह त्यांनी राजकीय कार्यात भाग घेतला होता. प्राधिकरण परिसर, विशेषतः यमुनानगर भागात बहुजन समाजाचा विचारप्रवर्तक चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. संभाजीराव काकडे, सोपानराव फुगे, डॉ. प्रतिभा लोखंडे, गजानन बाबर यांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी प्रचारात मोलाची भूमिका बजावली होती.
सक्रिय राजकारणातून निवृत्तीनंतर त्यांनी देहूतील गाथा मंदिराजवळ इंद्रायणी डोहाजवळ निसर्गरम्य परिसरात वास्तव्यास घेतले होते. याच ठिकाणी ९ जून रोजी त्यांनी अखेरचा ( Dr. Padmini Karad) श्वास घेतला.