situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Dehugaon : यंदा वारीत फेसबुक दिंडीची “वारी अभिजात मराठीची”

Published On:
Dehugaon
---Advertisement---

Team MyPuneCity – टीम फेसबुक दिंडीच्या वतीने यावर्षी “वारी अभिजात मराठीची” या मोहिमेतून मराठीची ऐतिहासिक परंपरा, साहित्यिक योगदान आणि सांस्कृतिक वारसा या क्षेत्रा मधील महत्व यंदाच्या वारी मध्ये मांडणार (Dehugaon) असल्याची माहिती फेसबुक दिंडीचे संस्थापक स्वप्निल राम मोरे यांनी दिली.

जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे यंदा ३४० वे वर्ष असून फेसबुक दिंडीचे हे १५ वे वर्ष आहे. फेसबुक दिंडी नेहमीच पंढरीच्या वारीतील e- वारकर्यांसाठी पालखीचे फोटो, व्हीडीओ तसेच लाईव्ह अपडेट्स सोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीकोनातून नवनवीन उपक्रम घेऊन वारी लाखो लोकांपर्यंत पोहचवली जात असते.

Srirang Kalaniketan : श्रीरंग कलानिकेतनच्या ४० व्या वर्धापनदिनी सायली तळवलकरांच्या गायनाने आली बहार

ज्ञानेश्वर महाराजांवी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम पूर्वीच केले आहे. त्याचा दाखला “जैसी दीपांमाझि दिवटी। कां तिथींमाझि पूर्णिमा गोमटी। तैसी भाषांमध्ये मर्‍हाटी । सर्वोत्तम।। दिला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी संत साहित्याचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ यांनी तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि सामाजिक समतेचे विचार लोकसुलभ मराठीत मांडले. त्यांच्या अभंग, ओव्या व भारुडांमुळे मराठी भाषेचा लय, ताल, शब्दसंपदा आणि भावनिक पोत समृद्ध झाला आहे. संत साहित्यामुळे मराठी भाषेला गहिरेपणा, सामाजिक मूल्यं, आणि सांस्कृतिक वारसा लाभला जो अभिजाततेचा मुख्य आधार (Dehugaon)ठरतो.

Alandi : इंद्रायणी नदी पुलाजवळील पाण्याच्या पाईप लाईन दुरुस्तीचे काम पूर्ण ; शहरातील टाक्या भरल्यानंतर होणार पाणीपुरवठा

आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळविणे म्हणजे साहित्य, कला आणि संस्कृतीच्या गौरवाची मान्यता मिळणे. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला गेल्यामुळे तीची ऐतिहासिक परंपरा, साहित्यिक योगदान आणि सांस्कृतिक वारसा यांना मान्यता मिळाली. अभिजात भाषांच्या यादीत समावेश झाल्यामुळे आपल्या मराठी भाषेची ओळख जागतिक स्तरावर वाढली. यामध्ये संत साहीत्याचा मोठा वाटा आहे. मराठी भाषा केवळ संवाद साधण्याचे एक साधन नाही, तर ती एक सांस्कृतिक ओळख, सामाजिक एकता आणि शैक्षणिक समृद्धीचे प्रतीक आहे. यामुळे मराठी भाषेच्या संवर्धनाकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत मोरे यांनी व्यक्त केले (Dehugaon)आहे.


यंदाचे फेसबुक दिंडी चे नवीन गाणे “चला रे पाहू सोहळा पंढरीचा” हे गाणे देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. याचे गीत लेखन व संगीत आनंद ओक यांनी केले आहे. यासाठी फेसबुक दिंडी टीम चे सदस्य स्वप्नील मोरे, सुरज दिघे, अमोल निंबाळकर, संतोष पाटील, अमोल गावडे, मंदार जाधव, सागर गंधारे, ओंकार महामुनी, निखिल पवार, सुमित चव्हाण हे सर्वजन वारी फेसबुक दिंडीच्या माध्यमातून भाविकांपर्यंत पोहचविण्याचे काम करणार ( Dehugaon) आहे.

Follow Us On