Team MyPuneCity –अवघ्या काही दिवसांवर आलेल्या ३४० व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळा आलेला असताना श्री क्षेत्र देहूगाव ते तीर्थक्षेत्र भंडारा डोंगराकडे जाणारा रस्ता येलवाडी मार्गे व तळेगाव चाकण रस्त्यावरील देहूफाटा ह्या रस्त्याची पुर्णपणे चाळण झाली आहे.
यारस्त्याने प्रवास करणाऱ्या भाविकांना व कामगारांना वाहने खड्डे चुकवित चालविताना मोठी कसरत करावी लागत असल्याने त्रस्त झाले आहे. या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम व्यवसायीकांनी तातडीने याची डागडुजी करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांसह तळेगाव चाकण महामार्ग कृतीसमिती अध्यक्ष नितीन गाडे यांनी केली आहे. देहूगाव ते तळेगाव चाकण रस्ता हा केवळ ३ किलीमीटर रस्ता व येलवाडी गाव प्रवेशद्वार कमान ते भंडारा डोंगर पायथा हा मधुन जाणारा रस्ता मोठ्या प्रमाणात उखडला आहे.
सध्या मान्सुन पुर्व पाऊस(वळीव) व चक्री वादळामुळे पाऊस पडत आहे. या मार्गावर पाणी साचत असून रस्त्याला मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची अक्षश: चाळण झाली आहे. या रस्त्याचा काही भाग जाधववाडी धरणावरून पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या त्यावेळी या मार्गाची डागडुजी केली होती. त्यानंतर सातत्याने या रस्त्यावर खड्डे पडत आहेत.
Pune: पुण्यात वस्तीमध्ये वेगात गाडी चालवण्यास विरोध केल्याने दोन जणांकडून पिस्तुलातून गोळीबार; आरोपी अटकेत


सध्या पाऊस पडत असल्याने यात मोठी वाढ झाली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडून पाणी साचत आहे. याच मार्गाने पालखी सोहळ्यासाठी येणारे भाविक संत भागिरथी माता व श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर दर्शनासाठी जात असतात. या रस्त्यावर वाहतुक मोठ्या प्रमाणात असते. या मार्गावर खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही त्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे व लहान मोठे अपघातही होत आहे. त्यामुळे या रस्त्याची पालखी पुर्वी डागडुजी तातडीने करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.