Team MyPuneCity – – “तुका म्हणे ऐसे अर्त ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे” या ओळींप्रमाणेच लाखो भक्तांच्या ह्रदयात स्थान असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या पावन पालखी सोहळ्याने आज दुपारी पंढरपूरच्या दिशेने भावनिक आणि भक्तिभावाने नटलेले ( Dehu) प्रस्थान केले. देहू नगरीतून निघालेला हा ३४० वा पालखी सोहळा आजही आपल्या शिस्तबद्धतेतून, भक्तिभावातून आणि परंपरेतून एक गहिवराची अनुभूती देणारा ठरला.
Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेतर्फे एक विद्यार्थी एक झाड उपक्रम
या ऐतिहासिक प्रस्थान सोहळ्याची सुरुवात पहाटे चार वाजता काकडआरतीने झाली. इंद्रायणीच्या काठी, मंदिर परिसर आणि देहू नगरी संपूर्णपणे “ज्ञानोबा-तुकाराम” या जयघोषात दुमदुमून गेली होती. संतांचे अभंग, टाळमृदंगाचा गजर, भगवी पताका खांद्यावर घेतलेल्या विणेकऱ्यांची अचूक रेषा – या सर्वांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हावून निघाला.

पहाटेपासूनच धार्मिक विधी आणि महापूजा पार पडत होत्या. पादुकांची विशेष महापूजा मोरे परिवाराच्या प्रमुख आणि विश्वस्तांच्या हस्ते पार पडली. तपोनिधी नारायण महाराज मंदिर, शिळा मंदिर आणि मुख्यमंदिरात शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करण्यात आली. सकाळी ९ वाजता घोडेकर सराफ परिवाराच्या वतीने पादुकांना चकाकी देण्यात ( Dehu) आली.


Pune : राज्यात देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन साजरा करण्यास शासनाची मान्यता
या पावन सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते सकाळी ११ वाजता झालेला पादुकांचा मानाच्या दिंडीतून भजनी मंडपात आगमन. टाळ, मृदंग, तुतारीच्या निनादात, भक्तगजरात आणि फुलांच्या साक्षीने संतांची पादुका जबाबदारीने पालखीत विराजमान करण्यात आली.
या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावत महापूजा करून आरती केली. यावेळी पावसाच्या सरींनी वरुणराजानेही या सोहळ्याला आपल्या उपस्थितीची साक्ष दिली. विविध मान्यवर, खासदार, आमदार, प्रशासनातील अधिकारी, आणि हजारो ( Dehu) वारकरी यावेळी उपस्थित होते.
सांजवेळी साडेचारच्या सुमारास पालखीने प्रदक्षिणा घेतली आणि सहाच्या सुमारास इनामदार वाड्यात पहिल्या मुक्कामी विसावली. याच ठिकाणी रात्री पारंपरिक कीर्तन झाले.
या सोहळ्याच्या निमित्ताने देहू नगरी पुन्हा एकदा भक्ती, त्याग, सेवाभाव आणि सामूहिक श्रद्धेचा साक्षात जिवंत अनुभव बनली. वारकऱ्यांच्या शिस्तबद्ध रांगा, मुखातील हरिनाम, आणि अंतःकरणात असलेली विठुरायाची ओढ – या साऱ्यांनी या वारीला एक अविस्मरणीय अध्यात्मिक तेज दिलं.
पंढरपूरकडे सुरु झालेला हा पालखी प्रवास आता वारीच्या सागरात सामावणार असून, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लाखो भाविकांच्या भावविश्वात पंढरपूरची वाट अधिक पवित्र होऊन उरणार ( Dehu) आहे.