situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Chikhli: भारताला भा-रत बनवुया- डॉ. अजित जगताप

Published On:

संस्कृती संवर्धन भजन महासंघ चिखली विभागाचा भजन सादरीकरण महोत्सव उत्साहात संपन्न.

Team MyPuneCity – शनिवार दिनांक २८ जून रोजी आषाढ मास निमित्त श्री साई मंदिर संभाजीनगर येथे चिखली परिसरातील १४ महिला भजनी मंडळाचे सादरीकरण करण्यात आले.

पहलवामा हल्यानंतर सर्वांनी पाहिले, आपण ऑपरेशन सिंदुर राबविले आपल्या जवानांनी दहशतवाद्याना नेस्तनाभूत केले. आपले सैन्य दल भारताच्या सीमांचे रक्षण करत असताना आपण सर्वांनी भारताला भा-रत बनविण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे. आपली भाषा, भूषा, भोजन, भजन, भ्रमण भक्ती, भाव जपण्यासाठी प्रयल केला पाहिजे. आपली ज्ञान परंपरा, गुरुकुलीय शिक्षण पद्धत, संस्कार, सण, रूढी परंपरा जपण्याचा प्रयल केला पाहिजे आणि या सर्व गोष्टी पुढील पिढीपर्यंत पोहचविल्या पाहिजेत. आज अनेक षडयंत्राच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीवर जे आघात होत आहेत. वेगवेगळ्या जिहादाच्या माध्यमातून तरुण-तरुणींना फसवले जात आहे. त्यासाठी जेष्ठ नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे असे प्रतिपादन डॉ. अजित जगताप यांनी समारोपाच्या कार्यक्रमात मत व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे सांस्कृतिक संवर्धन व विकास महासंघ विभागाच्या अंतर्गत संस्कृती संवर्धन भजन महासंघ चिखली विभागाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आषाढ मास निमित्त श्रीमंत जगद्गुरु साईबाबा प्रतिष्ठानचे संभाजीनगर येथील श्री साईबाबा मंदिरात भजन सादरीकरण महोत्सव संपन्न झाला त्यात १४ भजनी मंडळाने सादरीकरण करत सुमारे ३०० सदस्यांचे एकत्रीकरण झाले.

या कार्यक्रमात श्री गजानन बाल भजनी मंडळाचे सादरीकरण सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नुकतेच स्थापन झालेल्या या भजनी मंडळाने पहिल्यांदाच सार्वजनिक व्यासपीठावर भजन सादरीकरण केले त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कौतुक केले.

भारतीय स्त्री ही भारतीय संस्कृतीचा परंपरेचा महत्त्वाच्या भूमिकेत आहे. आपल्याकडे असलेले विविध कौशल्य, उद्याच्या भारताचे भविष्य असलेले बालकापर्यंत पोहोचवले पाहिजे. प्रत्येक भजनी मंडळाने संस्कार वर्ग व बालकांचे प्रबोधन कार्यशाळा सुरू करून आपल्याला मिळालेले संस्काराचे, अनुभवांचे बाळकडू येणाऱ्या पिढीला दिले पाहिजे, असे संस्कृती संवर्धन भजन महासंघाचे अध्यक्ष अर्चना सोनार यांनी आपल्या मनोगतात म्हंटले आहे.

भारत माता प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रसंगी मंगलाताई कदम, रवीजी कळमकर, प्रदीप पाटील, राजेंद्र देशपांडे, भास्कर रिकामे, ह भ प गायत्री थोरबोले, ह भ प माऊली देशमुख, मनीषा बर्गे, कीर्ती जाधव, मनीषा गटकळ, सारिका पवार, रिटा सानप, सुनील बर्गे व अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थितीत होते.

सूत्रसंचालन शिवानंद चौगुले यांनी केले, भजनी मंडळातील प्रत्येक सभासदांना समृद्धी मोटर ड्राइविंग स्कूलच्या वतीने भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले व एकत्रित रिंगण सोहळा साजरा करीत कार्यक्रमाची सांगता झाली.

Follow Us On