Team MyPuneCity – बीड जिल्ह्यातून धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर एक भीषण अपघात झाला आहे. एका अपघातामधून (Beed Accident News) बचावलेल्या सहा जणांना दुसऱ्याच क्षणात भरधाव ट्रकनं बेदरकारपणे अक्षरक्ष: चिरडले आहे.
गेवराई शहरानजीक असणाऱ्या गढी पुलावरुन एका एसयूव्ही (Beed Accident News) कार मधून सहा जण प्रवास करत होते. रात्रीच्या वेळी रस्ता रिकामा असल्याने गाडी भरधाव वेगाने जात होती. मात्र अचानक कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार डिव्हायडरला जाऊन धडकली. यावेळी कारमधील काहींना किरकोळ मार बसला. मात्र कारचे काही प्रमाणात नुकसान झाले. अशातच डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीतील सर्वजण बाहेर आले . या दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने या सहा जणांना जोरदार धडक देत अक्षरक्ष: चिरडत नेले. यात त्या सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात मध्यरात्री झाला.
बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे अशी मृत झालेल्यांची नावे झाली असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीवर सध्या उपचार सुरू आहेत.
या घटनेत ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळावरुन फरार झाला असून पोलीस ट्रक चालकाचा (Beed Accident News) शोध घेत आहे.