Team My Pune City –बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीच्या (Bachchu Kadu)मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली . नागपूरमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. शेकडो शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी आवाज उठवला. दरम्यान, बुधवारी कोर्टाने आंदोलनस्थळ खाली करण्याचे आदेश दिल्यानंतर बच्चू कडू आणखीनच आक्रमक झाले. त्यांनी पोलिसांना पत्र लिहून एक तासात अटक अन्यथा आम्ही पुन्हा एकदा आंदोलस्थळी जाऊ, दरम्यान यासोबतच त्यांनी शेतकरी कर्जमाफीवर तोडगा निघाला नाही तर रेलरोको करण्याचा देखील इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर अखेर राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांना मुंबईत चर्चेसाठी बोलावले. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करून असं आश्वासन या बैठकीत बच्चू कडू यांना मिळालं आहे, यावर आता बच्चू कडून यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Rohit Arya : पवईत थरार : १७ शाळकरी मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा पोलिस एन्काऊंट
Run for Unity : ‘रन फॉर युनिटी’मधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
बच्चू कडू म्हणाले ,आम्ही तारखेसाठी आलो होतो, सरकारकडून तारीख भेटली आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी दिल्याशिवाय राहणार नाही असा शब्द दिला आहे. आम्ही देखील तारखेसाठी आलो होतो, योग्य वेळ कधी आहे त्यांनी ती योग्य दिलेली आहे. त्यामुळे आम्ही आता तरी समाधानी आहोत. अजूनही इतर काही बाबींवर चर्चा होणार आहे. ज्यांना एक लाख रुपये पेन्शन असते, जे मोठे व्यापारी आहेत अशा लोकांना कर्जमाफीची गरज नाही, सातबारा कोरा होणारच सातबारा कोरा करावाच लागेल, असं यावेळी बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.



















