Team MyPuneCity – शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी ( Bacchu Kadu) यासह विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या बच्चू कडूंनी आज सातव्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतले आहे. शुक्रवारी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली होती. या भेटीत सरकारने त्यांच्या मागण्यांची गंभीरतेनं दखल घेतली असून मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय पटलावर येईल, असे म्हटले होते. त्यानंतर, आज मंत्री उदय सामंत यांनी लेखी पत्र दिल्यानंतर बच्चू कडूंनी आपलं उपोषण सोडलं आहे .
प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांचे गेल्या सहा दिवसापासून अमरावतीत अन्नत्याग आंदोलन सुरु होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी हे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी बच्चू कडूंची भेट घेत अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावं, अशी विनंती केली होती. त्यांनी बच्चू कडू यांच्या समोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. फडणवीस यांनी बच्चू कडू यांच्याशी संवाद साधला.
Dehuroad Crime News : शिवीगाळ करू नको म्हणाल्याने मारहाण
यावेळी बोलताना फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी ( Bacchu Kadu) संदर्भात समिती नेमली जाईल, या समितीमध्ये बच्चू कडू हे देखील असतील, या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यानंतरही बच्चू कडू आपल्या उपोषणावर ठाम होते? समिती कधी स्थापन करणार हे जाहीर करावं, अशी त्यांची मागणी होती. त्यानंतर आज मंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली. उदय सामंत हे पत्र घेऊन आले होते.
Alandi : आळंदीतील रस्त्यावरील दिव्यांच्या खांबावर लावलेल्या बॅनरमुळे धोका
कर्जमाफीसंदर्भात येत्या 15 दिवसांच्या आता उच्चस्तरिय समिती नेमली जाईल, त्याचा अहवाल आला की कर्जमाफी होईल. बच्चू कडू यांनी केलेल्या मागण्या कशा मान्य केल्या जातील याचं पत्र घेऊन मी आलो आहे. मी यासंदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. कर्जमाफीसाठी येत्या 15 दिवसांच्या आत उच्चस्तरिय समिती नेमली जाईल, असं यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं.
दरम्यान यानंतर बच्चू कडू ( Bacchu Kadu) यांनी अखेर सातव्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मात्र उपोषण मागे घेतानाच त्यांनी आता कर्जमाफी संदर्भात सरकारला नवी डेडलाईन दिली आहे. येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीची तारीख सांगावी अन्यथा मंत्रालयात घुसू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.