परमात्माच संतांच्या रूपाने अभिव्यक्त होतो:ह भ प चैतन्य महाराज देगलूरकर
Team MyPuneCity –संत ज्ञानेश्वर महाराज ७५० वा जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवा निमित्त दि.६ते ८ ह भ प चैतन्य महाराज देगलूरकर यांचे संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र विषय घेत त्याचे चिंतन होत आहे.यात संतांचे चरित्र का अभ्यासिले पाहिजे?संतांचे चरित्र ऐकणे म्हणजे काय आहे?याची प्रस्तावना सांगून चरित्र शब्द चा अर्थ माहिती त्यांनी सांगितली.चरित्र शब्दाचा अर्थ सांगताना त्याचा अर्थ कृती , अवस्था ,पराक्रम,हेतू,इतिहास ,घटनाक्रम , याबाबत सविस्तर कथन केले.
तसेच ते म्हणाले चरित्र दोन प्रकारचे असते. एक लीलाचरित्र व दुसरे अनुभाव चरित्र.ज्या चरित्राच्या श्रवणाने आनंद मिळतो त्याला लीला चरित्र म्हणतात.ज्या चरित्राच्या आचरणाने आनंद मिळतो त्याला अनुभाव चरित्र म्हणतात. चरित्रा संबंधित आचरण व श्रवण प्रवृत्ती याबाबत त्यांनी माहिती दिली.यामध्ये माऊलींच्या लीला चरित्रात रेड्या मुखी वेद वदवली,भिंत चालवली तसेच अनुभवा चरित्रात खोटे बोलू नये याचे उदाहरण त्यांनी दिले.
Jitendra Dudy: शहरी व ग्रामीण भागात ऑपरेशन अभ्यासातंर्गत सहा ठिकाणी मॉक ड्रिल यशस्वी – जितेंद्र डुडी
ज्ञानोबारायाचे लीला चरित्र,अनुभवा चरित्र ऐका, असे नामदेवराया पासून,नाथ महाराज पासून तुकोबाराया पासून निळोबाराया पर्यंत सगळे संत ज्ञानोबारायांचे चरित्र सांगतात.

चरित्र निर्मिती चा विचार करताना किंवा निर्माण झालेल्या चरित्राचा मागोवा घेताना तीन गोष्टींचा विचार चरित्रावर पडलेला असतो.एक ज्याचे चरित्र निर्माण होते ज्यात तो ज्या काला मध्ये राहतो त्या काला मध्ये कोणत्या पद्धतीचे साहित्य जीवनात प्राप्त झाले असते त्यावरून चरित्र सिद्ध होते.दुसरे साहित्या बरोबर कोणते राज्यशासन चालू असते,याचा परिणाम चरित्रा वर पडतो.तिसरे ज्या काळात चरित्र घडत असते त्या काळात ,त्या काळा पूर्वीच्या संत आणि ऋषी मुनींची चरित्र त्यांना उपलब्ध झालेली असतात. साहित्य,राज्यशासन आणि संतांची चरित्र या तीन गोष्टी चांगल्या पद्धतीने हातास लागल्या तर चरित्र निर्माण होते.संत ज्ञानेश्वर,एकनाथ महाराज ,तुकोबाराय नित्यनेम वाड्मय वाचन याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
आपल्याला ज्ञानेश्वरी, नाथभागवत,भावार्थ रामायण आणि तुकोबारायांचे अभंग निळोबारायांच्या अभंगा पर्यंत वाड्मय आपल्याला मिळाले.या वाड्मयाचे संदर्भ ज्यावेळेला आपल्या जीवना मध्ये आपल्या कृतीतून सहज अभिव्यक्त व्हायला लागतील त्यावेळेला डोळे झाकून त्या व्यक्तीच्या संदर्भात असे समजावे याचे चरित्र पुढच्या काळात समाजाला दिशा देणारे ठरणार आहे.असे यावेळी त्यांनी कथन केले.
ज्ञानोबारायांच्या नंतर महाराष्ट्रा मध्ये असे संत झाले नाही त्यांनी ज्ञानोबारायांचे वर्णन केले नाही.ज्ञानोबारायांच्या नंतर महाराष्ट्रा मध्ये जन्माला येऊन सुद्धा संत म्हणून ज्ञानोबारायांचे वर्णन केले नसेल तर आम्ही त्यांना संत म्हणण्यास तयार नाही.असे ते म्हणाले.
आपण कोणत्या पद्धतीचे वाड्मय वाचतो यावरुन आपले चरित्र घडत जात असते.बारकाईने लक्षात ठेवून वाड्मयाचा स्वीकार करता आला पाहिजे.आम्ही कोणते वाड्मय वाचतो याच्या वरून चरित्र निर्मितीचे संकेत मिळत जातात.
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत जे साहित्य अलंकार वापरले आहेत ते अनेक आहेत. संस्कृत मराठी मधील अत्यंत दुर्लभ ,दुर्मिळ,असणारे अलंकार ज्ञानोबारायांनी लीलया सह सहजतेने वापरले दिसतात.अर्थअलंकाराचा विचार करताना सुद्धा काव्य प्रकाशानी ४२ अलंकार सांगितले आहे.ज्ञानोबारायांनी जवळ जवळ सगळे वापरले आहेत. यात साहित्य दृष्टीची व्यापकता आहे. वाड्मय गणेशाची निर्मिती ज्ञानोबा रायांच्या स्वतंत्र कलाकृती आहे. आता पर्यंतच्या कोणत्याही वाड्मयाचा याच्यावर प्रभाव नाही.याचा प्रभाव अन्य सगळ्या ग्रंथांवर पडला आहे. ज्ञानोबारायांच्या अक्षरा अक्षरातून ज्ञानोबाराय उभे राहतात. म्हणून ज्ञानेश्वरी आमच्या जीवनाचा आधार आहे म्हणजे काय ज्ञानोबारायच जीवनाचा आधार आहे.असे पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ते म्हणाले.
Kalapini Swasthya Yog: कलापिनी स्वास्थ्ययोगाचा २१ वा वर्धापन दिन व जागतिक हास्यदिन उत्साहात साजरा….
आज दि.७ रोजी दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात ह भ प चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र हे अलौकिक आहे.हे चरित्र तुमच्या आमच्या कल्याणा करीता व्यक्त झालेले चरित्र आहे.परमात्माच संतांच्या रूपाने अभिव्यक्त होतो.ज्ञानेश्वर महाराजांचे सकल चरित्र हे माणसाला केवळ आदर्श रूपाने समोर राहत नाही,तर आपल्या जीवना मध्ये आपल्या जीवनाच्या अंतिम ध्येयाच्या जाणिवेतून त्या ध्येय प्राप्तीकरता आवश्यक असणाऱ्या जीवनमूल्यांच्या प्रेरणा निर्माण करण्याचं कार्य ज्ञानेश्वरांचे चरित्र करून देते.चरित्र या शब्दाच्या आधाराने, चरित्र एका शब्दाच्या अर्थातून त्यांच्या जीवनात त्यांचे आचरण,त्यांची क्रिया पाहता येते.त्यांची अवस्था पाहता येते.चरित्र शब्दातून त्यांनी गाजवलेला पुरुषार्थ ,त्यांनी जगताच्या कल्याणा करता केलेले कार्य याचा विचार करता येतो. चरित्र या शब्दातून ज्ञानेश्वर महााजांच्या जीवनाचा इतिहास कथा आपल्याला पाहता येते.ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवना मध्ये जी जी केलेली आचरण आहेत ,जी अलौकिक कार्य आहेत त्या कार्याच्या सिध्दी करता ज्ञानेश्वर महाराजांच्या अं:तकरणा मध्येसूक्ष्म हेतू जो जगत कल्याणला कारण ठरणार आहे त्या हेतुचा चरित्र या अर्थाने विचार करता येतो.
माणसाच्या मुखातून बाहेर पडणारे वचन,माणसाच्या कृतीच्या मागे दिसणारी त्याची बुद्धी ,माणसाचा स्वभाव माणसाने गाजवलेले कर्तुत्व,माणसाचा आचार व माणसाचा व्यवहार या सहा गोष्टीतून माणसाचे ह्दय ओळखता येऊ शकते.ज्ञानोबरायांचा सर्वात मोठा चमत्कार हा आहे वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी विद्वानांना स्तिमित करणारे भाष्य प्रकट केले हे सर्वात मोठा चमत्कार आहे ज्ञानोबारायांचा.या चमत्कृतीला कालाची मर्यादा राहिली नाही.जो पर्यंत या जगता मध्ये जीव जन्माला येत राहणार तो पर्यंत ती ज्ञानेश्वरी त्या जिवाच्या कल्याणाची व्यवस्था म्हणून या जगता मध्ये शिल्लक राहणार आहे.
तसेच त्यांनी माऊलींनी चालवली भिंत , रेड्यामुखी वेद बोलविले याचा हेतू ,आचारशुद्धी ,सद्गुणांची प्राप्ती, कर्म,मोक्ष याबाबत माहिती देत भुतकाळ व भविष्यकाळ याचे विनाकारण चिंतन करू नये.व वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करावा असे त्यांनी सांगितले.
ज्ञानोबरायांच्या चरित्रातील अर्ध्या पेक्षा चरित्र करूण रसाची निर्मिती करणार आहे.सगळ कारुण्य आहे.असे सांगत ज्ञानोबारायांचे वडील विठ्ठलपंत व माता रुक्मिणी यांची जीवन कथा,त्यांचे देहांत प्रायश्चित व त्यानंतर माऊली व त्यांच्या भावंडांनी सोसलेली दुःखे याबाबत कथन केले. ज्ञानेश्वर महाराज जन्म तिथी,कृष्ण जन्म तिथी याबाबत सविस्तर माहिती देत ज्ञानोबरायांची अवताराची तिथी भगवान श्री कृष्णाची आहे. एवढे साधर्म्य सोडले तर पुढच्या ज्ञानोबरायांचे चरित्राचे साधर्म्य प्रभू श्रीराम जीवन चारित्रा सारखे आहे याबाबत सविस्तर कथन केले.तसेच श्रीकृष्ण व तुकाराम महाराज जीवन चरित्र साधर्म्य
यावेळी सांगतले.
मनुष्य जीवनातील स्वार्थी ,परमार्थी, सहानुभूती व समानअनुभती विवेचन करून उदाहरणे दिली. तिसऱ्या सत्रात माऊलींचे आणखी काही प्रसंग व वाड्मय निर्मितीतून ज्ञानेश्वर महाराज दिसणे या विषयी सांगणार आहेत.