Team My pune city –आळंदी नगरपरिषदेकडून शहरातील स्वच्छता राखण्यासाठी कठोर पावले उचलण्यात (Alandi)येत असून, रात्री उघड्यावर कचरा टाकून जाणाऱ्या नागरिकांवर आता थेट कारवाई सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात नगरपरिषदेकडून विशेष कर्मचारी नेमून गस्त वाढविण्यात आली असून, कारवाई दरम्यान नागरिकांवर ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
संबंधित नागरिकांना दंडाची अधिकृत पावती देण्यात आली आहे, कचरा टाकणारे याचे फोटो व व्हिडिओ रेकॉर्डिंग करून कारवाई करण्यात येत आहे.
Sharad Pawar : पिंपरी चिंचवड महापालिकेत शरद पवारांची सत्ता येणार
Talegaon Dabhade Award : ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब जांभुळकर व उद्योजक शंकरराव शेळके
या मोहिमेमुळे उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांच्या वर्तनावर नियंत्रण करण्यात येत असून, नागरिकांत सकारात्मक बदल दिसून येत आहे. घंटा गाडी उपलब्ध असतानाही उघड्यावर कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवर नियमबाह्य वर्तन म्हणून दंडात्मक कारवाई सुरू राहणार आहे.
नागरिकांना आवाहन
“कृपया कचरा घंटागाडीतच टाका. उघड्यावर कचरा टाकल्यास ₹५०० दंड आकारला जाईल.” “स्वच्छता हीच जबाबदारी” या भावनेने पुढे येऊन आळंदी शहर स्वच्छ ठेवण्यात सहकार्य करावे.अशी माहिती यावेळी आळंदी नगरपरिषदेच्या वतीने देण्यात आली.
तसेच संबधीत नागरिकांना शहरातील रस्त्यावर कचरा टाकू नये,कचरा घंटागाडीत टाकावा. असे ही कर्मचाऱ्यांद्वारे सांगण्यात येत आहे.