आळंदी येथे प.पू. मारोतीबुवा गुरव आळंदीकर वाघमारे यांच्या ८२ व्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्त दि.८ ते दि.११ पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ह भ प ज्ञानेश्वर कदम माऊलीं,ह भ प चैतन्य महाराज लोंढे(देवस्थान विश्वस्त),ह भ प देवेंद्र निंबाळकर महाराज,ह भ प ज्ञानेश्वर कुऱ्हाडे , ह भ प माऊलीं कदम (छोटे) यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.दि.११ रोजी सकाळी ८ ते ११ यावेळेत ह भ प माऊलीं कदम(छोटे) यांचे केल्याचे कीर्तन संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार २०२३ ज्यांना प्रदान करण्यात आला होता.ते डॉ नारायण महाराज जाधव यांना यावेळी समस्त आळंदीकर व समस्त वाघमारे गुरव परिवार यांच्या वतीने आळंदी भूषण वारकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी विश्वस्त योगी
निरंजननाथ ,व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर ,रामशेठ गावडे,डी डी भोसले,नंदकुमार कुऱ्हाडे,संकेत वाघमारे,डॉ. जाधव मुळचे नगर जिल्ह्यातील कर्जुले (ता. पारनेर) या गावचे आहेत.
घरात वारकरी संप्रदायाचा वारसा असल्याने त्यांची पावले अध्ययनासाठी आळंदीकडे वळली. तेथे सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत त्यांनी संत साहित्याचा अभ्यास सुरू केला. आळंदीतील गोपाळपुरा येथे आनंद आश्रमातील आनंदस्वामी ऊर्फ दन्तेस्वामी यांच्याकडे बरीच वर्षे राहून त्यांनी वारकरी पद्धतीचे शिक्षण घेतले.एकनाथी भागवत, विचारसागर, ज्ञानेश्वरी, वृत्तीप्रभाकर, पंचदशी अशा अनेक ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला आहे. वारकरी शिक्षण देणारी संस्था आळंदीत उभी करून त्यांनी शेकडो कीर्तनकार, प्रवचनकार, साधकांना घडविण्याचे काम केले आहे.
Alandi: डॉ नारायण महाराज जाधव यांना आळंदी भूषण वारकरी पुरस्कार
