Team MyPuneCity – संततधार पावसामुळे (Alandi) इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होऊन भक्ती सोपान पुल काहीश्या प्रमाणात पाण्याखाली गेल्याने रेलिंगवरील अडकलेली बहुतांशी जलपर्णी,इतर कचरा पालिकेच्या काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
गेले काही दिवस महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. मावळ परिसरात होत असलेल्या संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी मोठी वाढ झाली. यामुळे दि.२६ रोजी आळंदी येथील भक्ती सोपान पुल काहीश्या प्रमाणात पाण्याखाली गेला होता.


पादचाऱ्यांसाठी असणारा हा पुल रहदारी साठी बंद करण्यात आला होता. इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने सिद्धबेट बंधाऱ्यातील जलपर्णी वाहून जात होती.त्यापैकी काही जलपर्णी व इतर कचरा भक्ती सोपान पुलावरील लोखंडी रेलिंग अडकला होता. दि.२७ रोजी सुद्धा भक्ती सोपानपुलाला पाणी टेकले (Alandi) होते.
PCET : पीसीईटीच्यावतीने ‘दहावी नंतरची शाखा निवड’ या पुस्तकाचे विद्यार्थ्यांना मोफत वाटप
मागील दोन दिवसांपेक्षा आज दि.२८ रोजी इंद्रायणी नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी कमी झाली होती.आळंदी नगर परिषदेच्या वतीने आज भक्ती सोपान पुलावरील स्वच्छतेचे कार्य तत्परतेने सुरू गेले. रेलिंग वरील अडकलेली बहुतांशी जलपर्णी,इतर कचरा पालिकेच्या वतीने काढण्यात आला. तसेच पुलाची साफ सफाई करून पादचाऱ्यांसाठी तो पुल रहदरिसाठी खुला करण्यात आला.आषाढी वारी काळात या पुलावरून भाविकांची दर्शन बारीची रांग (Alandi) असते.