Team MyPuneCity -अंकली येथील (कर्नाटक) शितोळे सरकारांच्या वाड्यातून प्रस्थान झालेल्या माऊलींच्या अश्वांचे आळंदीतील सरदार बिडकर वाड्यात(हवेली) पावणे पाचच्या सुमारास आगमन झाले.प्रथा परंपरे नुसार प्रथम श्रीकृष्ण मंदिर,सरदार बिडकर वाड्यात उमेशजी बिडकर कुटुंबीयांकडून स्वागत करण्यात आले.तिथे काही वेळ आश्वांनी विश्राम केला
.माऊली मंदिरात अश्व आळंदी समीप आल्याचा निरोप देण्यात आला.तो निरोप मिळताच श्री गुरुहैबतराव यांच्या दिंडीने प्रथा परंपरेनुसार आश्वांचे स्वागत ,पूजा केली. सहा च्या दरम्यान माऊलींचे अश्व वरूण राजाच्या हजेरीत ,हरिनाम गजरात आळंदीत (खेड)आगमन होऊन मंदिरात गेले.त्यांचे मालक अरफाळकर यांनी स्वागत केले.
Kundmala Bridge Update : कोसळलेल्या साकव पुलावर अडकलेल्या सात दुचाकी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दोरखंडांनी बाहेर काढल्या
मंदिरात अश्वांची पूजा करण्यात आली. तदनंतर फूलवाले धर्मशाळेत मार्गस्थ झाले.यावेळी उर्जितसिंह राजे शितोळे सरकार, महादजीराजे शितोळे सरकार,उमेश बिडकर, विश्वस्त भावार्थ देखणे,विश्वस्त पुरुषोत्तम पाटील,व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके,पो. आ. मच्छिंद्र शेंडे,माऊलीचे मानकरी योगिराज कुऱ्हाडे पाटील,योगेश आरु,दिनेश कुऱ्हाडे पाटील,चोपदार, बल्लाळेश्वर वाघमारे, व वारकरी भाविक उपस्थित होते.फुलवाले धर्मशाळेत माऊलींच्या अश्व दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.आज दि .१८आणि उद्या दि.१९ पर्यंत अश्व आळंदीत असणार आहेत. दि.२० रोजी ते माऊलींच्या पालखी सोहळ्या बरोबर पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहेत.
