Team MyPuneCity – आळंदी शहरातील अवेळी लाईट बिल वाटप आणि रीडिंगच्या समस्येमुळे सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासांबाबत तक्रारारीचे (Alandi) आणि त्यासंबंधीत त्वरित उपाय योजनेबाबतचे निवेदन आळंदी शिवसेना शहर प्रमुख (शिंदे गट)राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांनी महावितरण कार्यालय, चाकण यांना दिले.या निवेदनात त्यांनी शहरातील सर्व सामान्य नागरिकांच्या समस्येकडे लक्ष वेधले .
Pimpri : इंदिरा गांधींनी लोकशाहीचा खून केला – महेश कुलकर्णी
वेळेवर लाईट बिल वाटप न होणे
दरमहा लाईट बिल वेळेवर मिळत नाही, ज्यामुळे नागरिकांना बिल भरण्यासाठी अडचणी येतात.
रीडिंग न घेतल्यामुळे अंदाजे बिल
रीडिंग घेण्याचे काम वेळेवर होत नसल्याने अंदाजे बिल पाठवले जाते.जे अनेकदा चुकीचे आणि जास्त रकमेचे असते. यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक ताण सहन करावा (Alandi) लागतो.
महावितरण कार्यालयात वारंवार हेलपाटे
अंदाजे बिल कमी करण्यासाठी किंवा बिलाशी संबंधित तक्रारी सोडवण्यासाठी नागरिकांना वारंवार महावितरण कार्यालयात चकरा माराव्या लागतात, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो.
Maval : सुदुंबरे ते निगडी बस सेवेची वर्षपूर्ती
या सर्व समस्यांमुळे आळंदीतील सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. यावर त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.त्यामध्ये लाईट बिल वाटपाची प्रक्रिया नियमित आणि वेळेवर करावी. रीडिंग घेण्याचे काम निश्चित वेळापत्रकानुसार आणि पारदर्शकपणे (Alandi) करावे.
चुकीच्या किंवा अंदाजे बिलाच्या समस्येचे त्वरित निराकरण करण्यासाठी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करावा इत्यादींचा समावेश आहे. आळंदी शहरातील समस्यांचे निराकरण तातडीने करावे आणि सामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी करावा. या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्याल आणि त्वरित उपाययोजना कराल असे या निवेदनात नमूद केले आहे. यावेळी शाखा प्रमुख रोहिदास कदम, विनायक महामुनी, विशाल पंडीत तापकीर आदी उपस्थित (Alandi) होते.