Team MyPuneCity – संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आळंदीत आलेल्या वारकरी भाविकांसाठी शिवसेना आळंदी शहर शाखेच्या वतीने (Alandi) भक्तिमय सेवेचा उपक्रम राबवण्यात आला. शिवसेना शहर प्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वारकऱ्यांना प्रसाद वितरण आणि सुमारे ५०० तुळशी रोपांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाने पालखी सोहळ्यातील भक्तिमय वातावरणात आणखी भर पडली.
Pune : वारकऱ्यांना पादचारी मार्गांवर खाली बसून फराळ वाटप
काल, 19 जून रोजी रात्री माऊलींच्या पालखीने आळंदी येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. यावेळी आळंदी नगरीत वारकऱ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. या भक्तिसागरात सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे स्वागत करण्यासाठी शिवसेना आळंदी शहर शाखेने तुळशी रोपे आणि प्रसाद वाटपाचा (Alandi)उपक्रम हाती घेतला. तुळशीला वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे. त्यामुळे पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना तुळशी रोपांचे वाटप करून त्यांचा उत्साह वाढवण्यात आला. या उपक्रमातून शिवसेनेने वारकरी परंपरेचा आदर आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन (Alandi) घडवले.
Maval Crime News : तिकोना पेठ येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश वाडेकर, शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण, जन कल्याण कक्षाचे गोकुळ काकड, उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर घुंडरे, रोहिदास कदम, विशाल पंडित तापकीर, नितीन ननवरे, संतोष शेवाळे, सुयश कदम, मोहन फुलसुंदर, संगीता चव्हाण, स्वाती तापकीर, शांभवी चव्हाण, स्वाती शेवाळे, पोलीस मित्र राजेंद्र जाधव, बाळासाहेब जाधव, यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित(Alandi) होते. या सर्वांनी एकजुटीने वारकऱ्यांची सेवा करत पालखी सोहळ्याच्या शिस्तबद्ध नियोजनात योगदान दिले.
राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले की, “आषाढी वारी ही महाराष्ट्राची (Alandi) सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या भक्तीला नमन करत, त्यांच्या सेवेसाठी हा छोटासा प्रयत्न आहे. तुळशी रोपांचे वाटप आणि प्रसाद वाटपातून आम्ही वारकऱ्यांच्या श्रद्धेचे पूजन करत आहोत.”
दरम्यान, पंढरपूरच्या दिशेने सुरू असलेल्या या भक्तियात्रेत अशा उपक्रमांनी आणखी (Alandi) रंग भरला आहे.