Team My Pune City -पुणे जिल्ह्यात नव्याने तीन महापालिका कराव्या लागतील असे (Ajit Pawar)सूतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागात एक महापालिका आणि चाकण भागात एक आणि हिंजवडी भागात एक महापालिका करावी लागणार आहे. असे अजित पवार यांनी चाकण ( या. खेड) येथे म्हटले आहे. चाकण मधील वाहतूक कोंडीची पाहणी करताना त्यांनी ही मोठी घोषणा केली.
पुणे- नाशिक महामार्ग, चाकण- तळेगाव, चाकण- शिक्रापूर महामार्ग तसेच औद्योगिक वसाहतीतील रस्ते व वाहतूक कोंडी शुक्रवारी ( दि.८ ऑगस्ट ) सकाळी सहा वाजल्या पासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. यावेळी पोलिस आयुक्त, पीएमआरडीएचे आयुक्त आणि महामार्ग तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी खेडचे आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते आदींसह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
Rotary Club of Maval : रोटरी क्लब ऑफ मावळ तर्फे विद्यार्थ्यांना ‘आयडल स्टडी ॲप’चे मोफत वाटप
Madhav Patil: विधानसभा उपाध्यक्षांचा अवमान केल्याबद्दल पालिका आयुक्तांनी माफी मागावी आणि त्यांचे निलंबन करावे — माधव पाटील
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकण मधील तळेगाव चौकात पाहणी केली.
याचं चौकातून चाकण एमआयडीसीमध्ये कर्मचाऱ्यांना जावं लागतं. या एमआयडीसीमध्ये 1500 हून अधिक छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत, त्यात साडे तीन लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळे या परिसरात रोज लाखभर वाहने ये-जा करतात. रस्त्याची कामे होत नाहीत , त्यामुळं या चौकातील कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर निर्माण झालेले आहे. वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले असून ही समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड, आयटी पार्क, चाकणमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अॅक्शन मोडवर आले आहेत. दरम्यान शुक्रवारी भल्या पहाटे चाकण परिसरात उपस्थिती लावत कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी चाकणला स्वतंत्र महानगरपालिका होणार असल्याचे सूतोवाच केले.
पवार म्हणाले की, कुणाला आवडो किंवा न आवडो पण नजीकच्या काळात चाकण आणि या सर्व परिसरामध्ये महानगरपालिका करावी लागणार आहे, आणि महानगरपालिका केल्याशिवाय आपल्याला अधिकचा निधी मिळणार नाही.

म्हणून पोलिस अधिकाऱ्यांना खडसावले:
अजित पवार पाहणी करण्यासाठी तळेगाव चौक येथे थांबलेले असताना पोलिसांनी पुण्याहून नाशिक कडे जाणारी वाहतूक रोखून धरल्याने तळेगाव चौक ते आळंदी फाटा भागात प्रचंड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.
पवार म्हणाले की. मी सकाळी 6 वाजता दौरा करतोय, एक गाडी थांबली की गाड्यांच्या रांगा लागतायेत. मग पिक टाईममध्ये काय अवस्था होत असेल, असं अजित पवार म्हणाले. वाहने रोखून धरल्याने उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. हे बरोबर नाही. ही वाहनं थांबवून कोंडी का केलीय?, सगळी वाहतूक सुरु करा, असं अजित पवार म्हणाले. तसेच चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतुककोंडीचा आढावा घेताना अजित पवारांनी आधिकाऱ्यांना सूचना केल्या.