Team MyPuneCity – पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावरुन गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठा वाद सुरु होता. राज्य सरकारच्या या निर्णयावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र काल पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Maharashtra) हिंदी भाषेचा जीआर रद्द केला.
Pune : पुणे विमानतळावर ‘एअर इंडिया’ विमानाच्या 57 मिनिटे हवेतच घिरट्या, कारण
राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवली जाण्याच्या निर्णयाला कठोर विरोध केला जात आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य सरकारने तसा निर्णय घेतला होता. मात्र सरकारच्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. आता हाच विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करण्याबाबतचे दोन्ही निर्णय रद्द केले आहेत. तसेच एका समितीची स्थापना केली असून या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील भूमिका ठरवली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल( Maharashtra) केली .
हिंदी भाषा विषय लागू करण्याबाबतच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी काल मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत चर्चा झाल्यानंतर सरकारने त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी भाषेचा समावेश करण्याबाबतचे दोन्ही जीआर सरकारने रद्द केले आहेत ,असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले.
यावेळी बोलताना, त्रिभाषांच्या सूत्रांच्या संदर्भात तिसरी भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी? ती कशा प्रकारे करावी? मुलांना कोणता पर्याय द्यावा? याबाबतचा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्त्वात एका समितीची स्थापना करण्यात येईल. नरेंद्र जाधव हे कुलगुरू होते, ते नियोजन आयोगाचे सदस्य होते. आपण त्यांना शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखतो. त्यामुळे त्यांच्या नेतृत्त्वात एका समितीची स्थापना केली जाईल. यात आणखी काही सदस्य असतील. त्यांचीही नावे लवकरच घोषित केली जातील, अशी माहिती फडणवीस यांनी ( Maharashtra) दिली.
हिंदी सक्तीच्या विरोधात 5 जुलै रोजी ठाकरे बंधुंचा संयुक्त मोर्चा रद्द
या आधी हिंदी सक्तीच्या विरोधात 5 जुलै रोजी ठाकरे बंधुंचा संयुक्त मोर्चा काढण्यात येणार होता. पण सरकारच्या जीआर रद्दच्या घोषणेनंतर हा मोर्चा निघणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. पण 5 तारखेला विजयी मोर्चा काढायचा किंवा काही सभा घ्यायची का यावर विचार सुरू असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. 5 जुलै रोजी काहीतरी कार्यक्रम नक्की घेणार असंही ते म्हणाले. या संदर्भात मनसे, इतर पक्ष आणि मराठीच्या लढ्यात उतरलेल्या सर्व संस्थांशी चर्चा करणार असल्याचेही उद्धव ठाकरे( Maharashtra) यावेळी म्हणाले.
तसेच उद्धव ठाकरे म्हणाले , “राज्यात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. पण त्या विरोधात मराठी माणसाने एकजुट दाखवली. शिवसैनिक आणि इतर पक्ष, संस्थानी त्याला विरोध करत सरकारच्या जीआरची होळी केली. मराठी माणसाच्या दबावामुळे राज्य सरकारने हा जीआर रद्द केला. मराठी माणसाच्या शक्तीपुढे सरकारची सक्ती हरली.”