Team MyPuneCity –आळंदी (हवेली) इंद्रायणी नदी वरील जुन्या बंधाऱ्या जवळील लोखंडी रेलिंग खालील भर पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्याने ते धोकादायक झाले आहे.
तसेच बंधाऱ्याजवळील रस्त्याचा काहीसा भाग वाहून गेला आहे.बंधाऱ्या जवळील या भागात पावसाळ्यात इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्या नंतर त्या बाजूकडील काही रस्त्याचा भाग ,भर वेळो वेळी वाहून गेलेली दिसते.कधी कधी तेथील रस्ता बंद करण्याची वेळ येत असते.
नगरपरिषदेच्या वतीने कित्येक वेळा त्या भागात रस्ता दुरुस्ती साठी दगड,मुरूम इ.भर टाकण्यात आली.परंतु पावसाळ्यात इंद्रायणी नदीच्या पात्रातील पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने तेथील भाग वाहून जास्त असतो.
Pimpri:मेट्रो कंपाऊंडच्या अपुऱ्या सुरक्षेचा फटका – विद्यार्थिनी नंदिता तरळ जखमी ;अपघाताची तातडीने दखल घ्या, भाजपा चिटणीस सचिन काळभोर यांची मागणी

मागच्या वर्षी सुद्धा या भागात नदी पात्रातील पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने तेथील भाग वाहून गेला होता. व काही दिवस त्या रस्त्यावरून वाहतूक बंद करण्यात आली होती.यामुळे पालिकेने तेथील रस्ता खचू नये यासाठी योग्य ती उपाय योजना करावी.अशी मागणी नागरिक करत आहेत.