Team MyPuneCity – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा दि.१९ जून रोजी असून यानिमित्ताने आळंदीमध्ये लाखो वारकरी भाविक दाखल (Alandi) झाले आहेत व अजून वारकऱ्यांच्या दिंड्या आळंदीत दाखल होणार आहेत. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन दर्शनासाठी ज्ञानोबा माऊलीं तुकारामांच्या जयघोषात अनेक भाविक दर्शन घेत आहेत. आज आजोळ घर येथील दर्शन मंडप भाविकांनी पूर्णपणे भरून बाहेर भविकांची नवीन पूलापर्यंत रांग लागली होती.
Alandi: आळंदी नगरपरिषद शाळेत विद्यार्थी स्वागत तथा प्रवेशोत्सव साजरा
तद्नंतर ती स्कायवॉक पुलाकडे वळून पलीकडील दर्शनबारीस जोडण्यात आली. आज फॅब्रिकेटेड पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून दुपारनंतर तो फॅब्रिकेटेड पूल (Alandi) दर्शनबारीसाठी उपयोगात आणण्याची शक्यता आहे.





इंद्रायणी नदीकाठ वारकरी भाविकांनी फुलला आहे. अनेक भाविक पवित्र इंद्रायणीमध्ये स्नान करत आहेत. इंद्रायणी नदीची पाण्याची (Alandi) पातळी वाढली असून पोलीस कर्मचारी व पालिका आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी दक्षतेचे कार्य करत आहेत.
Bhat Sheti : सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे गणित बिघडले; मावळातील भात रोपवाटिका व पेरण्या अडचणीत
पालिका प्रशासनाने भाविकांसाठी ठिकठिकाणी मोबाइल टॉयलेट्स सुविधा केली आहे. पाण्याची टँकरची सुविधा केली केली आहे. शहरात अनुचित प्रकार होऊ नये तसेच शहरातील विविध हालचाली वर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले (Alandi) आहेत.
मंदिर परिसरासह शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांच्या आरोग्य सुविधेसाठी मंदिर व चाकण चौक,भैरवनाथ चौक ,ग्रामीण रुग्णालय अश्या विविध ठिकाणी आरोग्य केंद्र उभारले आहेत. माऊलींची भिंत,सिद्धबेट , विश्रांतवड या ठिकाणी अनेक भाविक येत असून त्या पवित्र स्थळाचे दर्शन घेत (Alandi) आहेत.