Team MyPuneCity – काल ( दि.11 रोजी) रात्री साडेआठच्या दरम्यान आळंदी शहरास पाणी वितरण चालू केले असता इंद्रायणी नदी पूल शेजारील पाईप लाईन निसटल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले. ती पाईप लाईन दुरुस्ती पालिकेच्या वतीने चालू करण्यात आली. तत्पूर्वी ती पाईप निसटल्याने मोठ्या प्रमाणात पाळी गळती (Alandi)झाली. त्या पाईप लाईनमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचे फवारे उडून तेथील रहदारी थांबली. आज ( दि. 12 ) सायंकाळी तेथील दुरुस्तीचे काम पूर्ण झाले.

त्यानंतर भामा आसखेड कुरुळी टॅपिंग येथून आळंदी जलशुद्धीकरण केंद्रास पाणी पुरवठा करण्यात आला. तो पाणी पुरवठा सायंकाळी सहाच्या दरम्यान आळंदी जलशुद्धीकरणात पोहचला. तसेच तो पाणीपुरवठा कमी दाबाचा असल्याची माहिती यावेळी पालिका कर्मचारी यांनी दिली.तसेच त्यांनी सांगितले जलशुद्धीकरण केंद्रातील जल टाक्या भरून झाल्यावर शहरातील जलटाक्या भरण्यात येणार आहे. तद्नंतर शहरास पाणीपुरवठा होणार आहे.
रात्री उशिरापर्यंत जलटाक्या भरून उद्या शहरात पाणी पुरवठा होऊ शकतो. प्रस्थान सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यातच आळंदीकर नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा होत नाही.यामुळे सोशल मीडियावर त्याबद्दल टीका करण्यात (Alandi)आली.
Vadgaon Maval : इथे धंदा करायचा नाही असे म्हणत रिक्षा चालकाला मारहाण
गावठाण परिसरात तीन चार दिवसांपूर्वी पाणीपुरवठा करण्यात आला होता.पाण्या अभावी नागरिकांचे हाल झाले. घरगुती उपयोगाकरिता सुद्धा पाणी उरले नव्हते.काल गावठाण परिसरातील पाणीपुरवठा बाबतचे वेळापत्रक जाहीर झाले होते आणि नवीन जोड काम करण्यात आलेल्या पाईप लाइनमध्ये ती समस्या आल्याने अद्यापपर्यंत पाणीपुरवठा होऊ शकला (Alandi) नाही.