situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi : जीवन घडविण्यासाठी आणि वाचविण्यासाठी ज्ञानेश्वरीचे महत्त्व अनन्यसाधारण – डॉ. सदानंदजी मोरे

Published On:
Alandi
---Advertisement---

Team MyPuneCity – श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती ज्ञानेश्वर महाराज संस्थान श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आणि पत्रकार संघ आळंदी देवाची यांच्या संयुक्त विद्यमाने मागील पाच वर्षापासून ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील ज्ञान आणि संस्कार मुलांपर्यंत ( Alandi) पोहोचावे या उदात दृष्टिकोनातून ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा उपक्रम सुरू केला.

बदलत्या काळातील संस्काराचे अनन्य साधारण महत्व लक्षात घेऊन आज महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील 88 शाळांमध्ये हा उपक्रम चालू झाला. या उपक्रमातील अध्यापन करणाऱ्या अध्यापक अध्यापिका यांना प्रशिक्षण देण्यासाठी श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते .

याप्रसंगी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंदजी मोरे वेदांत सत्संग समितीचे वेदांताचार्य डॉ. नारायण महाराज जाधव श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे कबीर बुवा सुप्रसिद्ध अर्थतज्ञ माजी विश्वस्त श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान डॉ. अभयजी टिळक जनकाई स्वाध्याय प्रतिष्ठान आळंदी देवाची अध्यक्ष ह.भ.प.सुभाष महाराज गेठे जिल्हा परिषद पुणे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर अध्यापक महाविद्यालय परेल मुंबईचे प्राचार्य सुरेंद्र हेरकळ सकाळचे संपादक मा. सम्राट फडणीस श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष व या उपक्रमाचे उद्गाते प्रकाश काळे राम मंदिर चे विश्वस्त अर्जुन मेदनकर ज्ञानेश्वर विद्यालयाचे प्राचार्य एस जी मुंगसे व त्यांचे सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच चरित्र समितीचे पदाधिकारी व सदस्य इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पुणे व जळगाव जिल्ह्यातून प्रशिक्षणासाठी अनेक शाळेतील शिक्षक शिक्षिका मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.

Pune : ‘दुबईमित्र’ सोमनाथ पाटील यांचा पुण्यात हृद्य सत्कार


याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. सदानंदजी मोरे म्हणाले श्री ज्ञानेश्वरी माणसाचे जीवन घडविते. वाचविते. हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्ञानेश्वरी हा मूळ ग्रंथ आहे वारकरी संप्रदायांमध्ये संत साहित्याचा ज्ञानेश्वरी आधारभूत ग्रंथ होता .ज्ञानेश्वरीची ओळख करून घेणे म्हणजे स्वतःची ओळख करून घेण्यासारखे आहे. वारकरी संप्रदायातील अभ्यासकांसमोर प्रश्न होता की समाजाला ज्ञानेश्वरी ची ओळख करून द्यायची पण ती कशी तर त्याचे उत्तर आज मिळाले ते या उपक्रमाच्या माध्यमातून. आज दुर्दैवाने जाती-जातीमध्ये भांडणे चालली आहेत आणि हे मिटवण्याचे काम आता कोणी करायचे? तर हा उपक्रम श्री ओळख ज्ञानेश्वरीचा त्याकरता महत्त्वाचा आहे .समाजातील वारकऱ्यांची, कीर्तनकारांची ,ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्यांची ,ज्ञानेश्वरी वाचणाऱ्यांची सुद्धा ही जबाबदारी ( Alandi) आहे.

ज्ञानेश्वरी हा नागरिकत्वाची जाणीव करून देणारा ग्रंथ आहे .आता तीच जाणीव कीर्तनकार आणि वारकऱ्यांनी समाजाला करून द्यावी कारण वारकऱ्यांचे उपरणे हे बांधिलकी आहे .ती विसरू नये. तिचे पुनर्जीवन झाले पाहिजे. सुखाचा शेवटचा टप्पा म्हणजे शांती आहे. संतांनी शांती परते सुख नाही हे सांगितलेल आहे. ज्ञानेश्वरी जगण्याचा आधार आहे. तंत्रज्ञान फार फोफावलेला आहे .त्यावर ज्ञानेश्वरी ग्रंथ फार महत्त्वाचा ठरत आहे . संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ अभय टिळक यांनी ओळख ज्ञानेश्वरी पुस्तकातील आठ ते 16 या धड्यांवर विचार व्यक्त करताना शालेय जीवनात मुलांना संस्कार देऊन सुसंस्कृत माणूस तयार करणे हा या उपक्रमाचा उद्देश असला ( Alandi) पाहिजे.

विज्ञान परंपरा श्रद्धा व लाभ या गोष्टीशी ज्ञानेश्वरीचा समन्वय साधून रोजच्या जगण्याशी ज्ञानेश्वरी जोडली गेली पाहिजे.असे प्रतिपादन केले.माध्यमिक विभागाचे शिक्षण डॉ.भाऊसाहेब कारेकर यांनी 88 शाळेमध्ये चालू असणारा उपक्रम संपूर्ण पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सुरू करण्याच्या उद्देशाने आवश्यक ती सर्वतोपरी मदत शिक्षण विभागाकडून केली जाईल असे सांगताना ज्ञानेश्वरी हा फक्त पारायणासाठी ग्रंथ नाही तर त्यातील ज्ञान प्रत्यक्ष जीवनात उतरणे आणि त्या नुसार आचरण करणे महत्त्वाचे असल्याचे विशद केले. सकाळची संपादक सम्राट फडणीस यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील ज्ञानेश्वरी चे महत्व विशद करताना सकाळच्या माध्यमातून या उपक्रमाला चांगले व्यासपीठ मिळवून देण्याचे मान्य करून या उपक्रमाचे कौतुक केले. प्राध्यापक हरिभक्त परायण सुभाष गेटे यांनी ओळख ज्ञानेश्वरी तील प्रथम आठ धड्यांवर कसे शिकवावे यावर मार्गदर्शन ( Alandi) केले.

Share your post!

प्राचार्य सुरेंद्र हेरकळ सर 16 ते 24 या ओळख ज्ञानेश्वरी च्या पुस्तकातील धड्यांवर मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या प्रत्येक सणाला आणि परंपरेला वैज्ञानिक कारण आहे. अध्यात्म हे विज्ञानाच्या पुढे आहे. माणसाच्या अंगी असलेले दुर्गुण नष्ट करून परमानंदाची प्राप्ती करण्याची ताकद ज्ञानेश्वरी मध्ये आहे. अहंकार विरहित जीवन खऱ्या आनंदाची प्राप्ती करण्याचे साधन आहे हे विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून पोहोचणे गरजेचे आहे असे सांगितले. हरिभक्त परायण डॉक्टर नारायण महाराज जाधव यांनी ओळख ज्ञानेश्वरी या पुस्तकातील 24 ते 32 या धड्यांवर मार्गदर्शन केले .

या उपक्रमाचे उद्गाते चरित्र समितीचे अध्यक्ष माननीय प्रकाश काळे यांनी उपक्रम माऊली आपणां सर्वांकडून करवून घेत आहेत अशी आदरयुक्त भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्री अजित वडगावकर यांनी केले. या कार्यशाळेचे आभार चरित्र समितीचे सदस्य तुकाराम गवारी यांनी मानले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन गणेश लिखे यांनी ( Alandi) केले.

Follow Us On