आळंदीतील ज्ञानपीठा करता ७०१ कोटी रुपयांचा आराखडा तयार-देवेंद्र फडणवीस
Team MyPuneCity – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ७५० जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आज दि.१० रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आळंदी मध्ये आगमन झाले होते.प्रथमतः संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे त्यांनी दर्शन घेतले.संजीवन समाधी मंदिरात विधिवत पूजा करून त्यांनी आशिर्वाद घेतले .तद्नंतर सप्तशतकोत्तर सोहळ्याच्या कार्यक्रम स्थळी आले.सप्तशतकोत्तर सोहळ्या निमित्त त्यांच्या हस्ते नमो ज्ञानेश्वरा पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.व देवस्थान च्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी जिल्हा न्यायाधीश संस्थान अध्यक्ष महाजन साहेब, विश्वस्त योगी निरंजनाथ ,विश्वस्त राजेंद्र उमाप,विश्वस्त भावार्थ देखणे,विश्वस्त रोहिणी पवार,विश्वस्त चैतन्य महाराज कबीर ,विश्वस्त पुरुषोत्तम पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमा वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले वारकरी संप्रदायाचे दर्शन माऊलीं पांडुरंगाचे दर्शन आपल्याला सर्व वारकऱ्यां मध्ये पहावयास मिळते.आपल्या सर्वां मध्ये पांडुरंग आहे.या देशात ज्या काळात जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात आक्रमणे होत होती ,भागवत धर्म संकटात होता,आस्थाची केंद्रे,धर्मस्थळे उध्वस्त होत होती,अशा काळा मध्ये या भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते वारकरी परंपरेने केले.संतांनी या भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचे काम केले.म्हणून इतकी आक्रमणे झाली आपली संस्कृती,धर्म व विचारे कोणीच संपवू शकला नाही.सप्ताहाच्या माध्यमातून भागवत धर्माचे सुविचार गावा गावात पोहचतात.काल्याच्या कीर्तनातून सामाजिक अभिसरण करण्याचे काम होते.किती ही भौतिक प्रगती झाली तरी जोपर्यंत त्याला आध्यात्मिक बैठक मिळणार नाही तो पर्यंत मन शांती मिळू शकत नाही.

जगातील सर्वात मोठी तीर्थयात्रा म्हणजे वारी आहे.वारीत सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वयं शिस्त आहे.जे वारी करतात त्यांच्या जीवनात वेगळा आनंद निर्माण होतो.जीवनाला शिस्त लागते.माउलींनी पहिल्यांदा गीता मराठीत पोहचवण्याचे कार्य केले. मराठी ला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला हा दर्जा मिळत असताना ज्या दोन चार वाड्मय यांनी हा दर्जा मिळण्याकरिता केंद्र सरकारच्या कमिटीला बाध्य केले त्यातील महत्वाचे वाड्मय म्हणजे ज्ञानेश्वरी होती.
Maharashtra : भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर
सर्वांची ईच्छा आहे देवस्थान ची साडेचारशे एकर जागा आहे, त्याच्या वर ज्ञानपीठ तयार झाले पाहिजे.या ज्ञानपीठा करता ७०१ कोटी रुपयांचा आराखडा तयार झालेला आहे. ते ज्ञानपीठ या ठिकाणी तयार होईल.भागवत विचार,शाश्वत विचार ,,सनातन विचार रुजला पाहिजे.या दृष्टीने सर्व प्रकारचे ज्ञान या ज्ञानपीठाच्या माध्यमातून शतकानुशतके पुढे गेले पाहिजे.अश्या प्रकारचे जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ या ठिकाणी तयार करणार आहोत.
इंद्रायणी नदीचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता. हा आराखडा सर्व मान्यता घेऊन केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच तो मंजूर करून घेण्यात येईल. याद्वारे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेसह ३९ गावातील पाणी शुद्ध करून इंद्रायणीत जाईल. इंद्रायणी नदीचे जल स्वच्छ, निर्मळ आणि पुजनीय होईल, असा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
Dehuroad Crime News : इमारतीच्या जिन्यात गांजा विक्रीच्या तयारीत असलेला आरोपी अटकेत; ४६ हजारांचा गांजा जप्त
तसेच ह भ प मारुती महाराज कुरेकर यांना पदम पुरस्कार देण्याची मागणी शिफारस केंद्र सरकार कडे करू अशी ग्वाही त्यांनी दिली.