Team My Pune City –गेल्या काही दिवसांपासून राज्यभर चर्चेत असलेल्या जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री प्रकरणाला ( Jain Boarding Land Case) आता नवे वळण मिळाले आहे. या व्यवहारात सहभागी असलेल्या गोखले बिल्डर्सने औपचारिकरीत्या माघार घेतली असून, कंपनीचे प्रमुख विशाल गोखले यांनी ट्रस्टला ई-मेलद्वारे व्यवहार रद्द करण्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी या व्यवहारासाठी दिलेले २३० कोटी रुपये परत मिळावेत, अशी मागणीही केली आहे.
Rashi Bhavishya 27 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?
मात्र, करारातील अटींनुसार व्यवहार रद्द झाल्यास ट्रस्टला पैसे परत करण्याची सक्ती नाही. त्यामुळे आता गोखले यांचे कोट्यवधी रुपये अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भातील सुनावणी धर्मादाय आयुक्तांकडे होणार असून, त्यांच्या आदेशावरच पुढील निर्णय अवलंबून आहे.
Vadgaon Maval: ‘उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा’!-मावळ तालुक्यात भक्तीमय वातावरणात काकड आरती सोहळा
या प्रकरणामुळे धार्मिक आणि सामाजिक पातळीवर मोठी खळबळ उडाली ( Jain Boarding Land Case) आहे. जैन मुनींनी पत्रकार परिषद घेऊन या विषयाला राजकीय रंग न देण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्ट केले की, हा प्रश्न गरीब विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित आहे. तसेच, २९ ऑक्टोबर रोजी सकल समाजाच्या वतीने एक दिवसाचे उपोषण करण्यात येणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निवेदन दिले जाणार आहे. १ नोव्हेंबर रोजी जैन बोर्डिंगच्या विश्वस्तांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप केला होता. मात्र, मोहोळ यांनी सर्व आरोप फेटाळले. जैन मुनींनीही स्पष्ट केले की, त्यांची तक्रार मोहोळ किंवा गोखले यांच्याविरोधात नाही. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मौन बाळगल्याबद्दल नाराजी व्यक्त ( Jain Boarding Land Case) करण्यात आली.


















