Team My Pune City –जाहिरात गुरू पद्मश्री पियुष पांडे यांचे आज मुंबईत निधन झाले (Piyush Pandey)आहे. त्यांनी वयाच्या 70व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पियुष पांडे यांनी अजरामर जाहिराती तसेच “मिले सूर मेरा तुम्हारा” हे गाणे लिहिले आहे. पियुष पांडे यांच्या निधनाचे कारण अज्ञात असून त्यांच्यावर आज मुंबईत अंत्यसंस्कार केले जातील. पियुष पांडे यांनी 2014 मध्ये भाजपचे घोषवाक्य “अबकी बार मोदी सरकार” देखील तयार केले.पल्स पोलिओ जाहिरात “दो बूंदे जिंदगी की” देखील तयार केली, जी आजही लोकप्रिय आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “पियुष पांडे त्यांच्या सर्जनशीलतेसाठी ओळखले जात होते. त्यांनी जाहिरातीच्या जगात प्रचंड योगदान दिले. त्यांच्याशी वर्षानुवर्षे झालेल्या संवादांना मी जपून ठेवेन. त्यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना माझी श्रद्धांजली.”
Nakul Bhoir Murder : घरगुती कलहातून सामाजिक कार्यकर्ता नकुल भोईर यांचा पत्नीने केला खून
Kothrud Crime News : कोथरूडमध्ये घरफोडी; आठ लाख दहा हजारांचा ऐवज चोरीला
पियुष 27व्या वर्षी जाहिरात जगतात सामील झाले. भाऊ प्रसून पांडे यांच्याकडून त्यांनी श्रीगणेशा केला. दोघांनीही दररोजच्या उत्पादनांसाठी रेडिओ जिंगल्समध्ये आवाज दिला. 2016 मध्ये भारत सरकारने पीयूषला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. तर 2024 मध्ये त्यांना एलआयए लेजेंड पुरस्कार मिळाला.


















