Team My Pune City -आज आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाची मुंबईत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला पुण्यासह सह राज्यातील अनेक जिल्ह्यांतील खासदार आणि आमदार उपस्थित होते.या बैठकीमध्ये राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत चर्चा करण्यात आली.या बैठकीत एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50 टक्के तरुणांना संधी देणार असल्याचे शरद पवारांनी जाहीर केले.
Maval: मावळ पंचायत समितीचे आरक्षण जाहीर
Gold-Price: सोनं-चांदी पुन्हा महागले
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ज्या तरुणांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही अशा तरुणांना एकूण जागांपैकी 50 टक्के जागांवर निवडणूक लढवण्याची संधी दिली जाणार आहे. जास्तीत जास्त तरुणांना संधी कशा प्रकारे देता येईल, ते बघा अशा सूचना शरद पवार यांनी या बैठकीत आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आगामी काळात कशा प्रकारे युती करायची याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची उद्या महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती बैठकीमध्ये देण्यात आली आहे.तसेच या आठवडाभरात स्थानिक पातळीवरील आघाडीबाबत निर्णय करा, अशा सूचनाही शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त वक्तव्या वर या बैठकीमध्ये शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले .पूर्वी आपल्या पक्षात असणारे एक आमदार सध्या जाती-जातीत तणाव निर्माण होईल, अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत, हे अत्यंत चुकीचं आहे. जातीय सलोखा ठेवा, स्थानिक पातळीवर, राज्य पातळीवर बोलत असताना जातीवाचक बोलू नका, बोलताना प्रेमाची भाषा वापरा, आपण करत असलेल्या विधानामुळे जातीय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना देखील शरद पवारांनी बैठकीत दिल्या आहेत.