situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Uddhav Thackeray Dasara Melava :मुसळधार पावसातही उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा; सरकारवर हल्लाबोल, कार्यकर्त्यांना सज्जतेचे आवाहन

Published On:
Uddhav Thackeray Dasara Melava

शिवतीर्थावर परंपरेचा मेळावा

Team My Pune City – दादरच्या शिवतीर्थ मैदानावर ( Uddhav Thackeray Dasara Melava)शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा पारंपरिक दसरा मेळावा आज मुसळधार पावसात पार पडला. मैदान चिखलमय झाले, कार्यकर्ते भिजले तरीही हजारोंच्या संख्येने शिवसैनिक ठामपणे मैदानात उभे राहिले. पावसाच्या सरींनी वातावरण भारावून गेले असतानाही कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.


पावसातही उत्साह कायम

सततच्या पावसामुळे कार्यक्रमातील भाषणांची संख्या कमी करण्यात आली. फक्त उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनीच भाषण केले. पावसामुळे ध्वनीव्यवस्था व प्रेक्षक व्यवस्थापनात अडचणी आल्या तरी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत वातावरण दणाणून सोडले. पावसात भिजत असतानाही कार्यकर्त्यांनी “जय महाराष्ट्र” आणि “उद्धव ठाकरे आगे बढ़ो” अशा ( Uddhav Thackeray Dasara Melava) घोषणा देत उत्साह कायम ठेवला.


पाकिस्तान, क्रिकेट आणि देशप्रेमाचा मुद्दा ( Uddhav Thackeray Dasara Melava)

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घराणेशाही आणि दुटप्पीपणाचा आरोप केला. “ज्या पाकिस्तानने पहलगाममध्ये धर्म विचारून भारतीयांना ठार केले, त्याच पाकिस्तानसोबत हे क्रिकेट खेळतात. एकीकडे बाप देशप्रेमाचं नाटक करतो आणि दुसरीकडे पोरगा पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतो,” अशा शब्दांत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपवर टीका केली.

मुंबई आणि महापालिका निवडणुका( Uddhav Thackeray Dasara Melava)

ठाकरेंनी मुंबईतील खड्डे, वाहतूक कोंडी आणि प्रशासनातील अकार्यक्षमता यावरून भाजपवर निशाणा साधला. “मुंबई जिंकली तर ती अदानीच्या घशात घालतील,” असा आरोप त्यांनी केला. भाजप हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करून मतं मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी म्हटले.

सोनम वांगचूक प्रकरण आणि कायद्यांचा दुरुपयोग ( Uddhav Thackeray Dasara Melava)

भाषणात त्यांनी लडाखचे पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचा संदर्भ घेतला. “देशभक्त असणाऱ्या वांगचूक यांना पाकिस्तान परिषदेत गेल्यामुळे देशद्रोही ठरवले. पण गुपचूप पाकिस्तानला जाऊन नवाज शरीफांच्या वाढदिवसाचा केक खाणारे मोदी कोण?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राज ठाकरेसोबत एकत्र येण्याचे संकेत( Uddhav Thackeray Dasara Melava)

राज ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याबाबत ठाकरेंनी स्पष्ट केले की, “जिथे मराठीची गळचेपी होईल, मातृभाषेचा प्रश्न येईल, तिथे आम्ही सगळं विसरून एकत्र येऊ.” मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी झालेल्या लढ्याची आठवण करून देत त्यांनी मुंबई कोणत्याही व्यापाऱ्याच्या घशात जाणार नाही असे ठामपणे सांगितले.

हिंदुत्व आणि भाजपवर आव्हान ( Uddhav Thackeray Dasara Melava)

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला. “हिंदुत्वावरून आमच्या अंगावर येऊ नका, नाहीतर तुमच्या टोप्या घातलेले फोटो आम्ही समोर आणू. भाजपने त्यांच्या झेंड्यातील हिरवा रंग आधी काढावा आणि मग आम्हाला हिंदुत्व शिकवावे,” असे ते म्हणाले. आसाममध्ये भाजप सरकार असताना गोमांस खाल्ले जाते, मग नेमकं धोरण काय हे ठरवावं, असे आव्हानही त्यांनी दिले.

शेतकरी, दुष्काळ आणि मदतीचा प्रश्न ( Uddhav Thackeray Dasara Melava)

राज्यातील शेतकऱ्यांच्या हताश स्थितीवर भाष्य करताना त्यांनी सरकारवर टीका केली. “आज मुख्यमंत्री म्हणतात ओला दुष्काळ असा प्रकारच नाही. कोणतेही निकष न लावता हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी. आमच्या सरकारने कर्जमाफी केली होती,” असे त्यांनी सांगितले. बिहारमध्ये निवडणुका आल्या तेव्हा पंतप्रधानांनी महिलांच्या खात्यात पैसे टाकले, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत केली नाही, असा आरोपही त्यांनी केला.

संघ, मणिपूर आणि केंद्र सरकारवर टीका ( Uddhav Thackeray Dasara Melava)

संघाच्या दसरा मेळाव्याचा उल्लेख करत त्यांनी गांधी जयंतीच्या दिवशी संघाच्या १०० वर्षांच्या कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मणिपूरमधील हिंसाचार, जनसुरक्षा कायद्याचा दुरुपयोग आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर त्यांनी कठोर शब्दांत टीका केली.

मुसळधार पावसात झालेल्या या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजप, केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर थेट हल्ला चढवला. हिंदुत्व, शेतकरी, मुंबई महापालिका, पाकिस्तान, सोनम वांगचूक, मणिपूर अशा विविध मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले. पावसात भिजूनही उपस्थित राहिलेल्या शिवसैनिकांच्या उत्साहाने मेळाव्याला विशेष उर्जा मिळाली

Follow Us On