Team My Pune City – राज्याच्या विविध भागांमध्ये ( Monsoon Update) पुढील तीन दिवसांमध्ये (दि. 26 ते 28 सप्टेंबर) पावसाच्या जोरात वाढ होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. काही भागांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, नदी-नाले तसेच घाट परिसरात पूरस्थिती निर्माण होऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.
बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यभर ढगाळ हवामानासह पावसाचे प्रमाण वाढणार आहे. किमान 5 ऑक्टोबरपर्यंत मान्सून राज्यात टिकून राहण्याची शक्यता हवामान विभागाने स्पष्ट केली आहे.
Baner Crime News : बाणेरमध्ये वैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला
हवामान विभागाच्या अंदाजानुसार
दि. 26 सप्टेंबर : दक्षिण विदर्भ व लगतच्या मराठवाड्यात (गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड) दुपारनंतर ढगाळ हवामान व पावसात वाढ होणार आहे. उर्वरित विदर्भ व मराठवाड्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता ( Monsoon Update) आहे.
दि. 27 सप्टेंबर : दक्षिण मराठवाड्यात (नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली) मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यवतमाळ जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून, मध्य महाराष्ट्रात (सोलापूरसह अनेक जिल्हे) हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. खानदेशात हलका पाऊस ( Monsoon Update) होईल.
Talegaon PWD : ‘पीडब्ल्यूडी’च्या निषेधार्थ तळेगावकरांचे ५ ऑक्टोबरला आंदोलन
दि. 28 सप्टेंबर : कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहील. अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांसह मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भ, पश्चिम मराठवाडा व खानदेशात हलका ते मध्यम पाऊस, तर उर्वरित विदर्भात प्रामुख्याने हलका पाऊस ( Monsoon Update) पडेल.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित स्थळी ठेवण्याचे, शेतीचे नियोजन हवामान अंदाजानुसार करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तसेच, घाट परिसर व कोकण विभागातील धरणांमध्ये पाणी साठा वाढण्याची शक्यता असल्याने नदी-नाल्यांना पूर येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असेही आवाहन करण्यात आले ( Monsoon Update) आहे.