Team My pune city – बॉलिवूडसह मराठी चित्रपटामध्ये ( Achyut Potdar)आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे वयाच्या ९१ वर्षी निधन झालं आहे. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय सेना आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये नोकरी केल्यानंतर पोतदार यांनी वयाच्या ४० व्या वर्षी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले.
Lonavala Rain : लोणावळ्यात मुसळधार पाऊस; पुढील ४८ तास रेड अलर्ट
अच्युत पोतदार यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले. त्यांनी गोविंद निहलानी, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी, सूरज बडजात्या आणि राम गोपाल वर्मा यांसारख्या मोठ्या दिग्दर्शकांसोबत काम केले. ( Achyut Potdar)आक्रोश, अर्ध सत्य, तेजाब, परिंदा, राजू बन गया जेंटलमन, दिलवाले, रंगीला, मृत्युदंड, इश्क, वास्तव, हम साथ साथ हैं, परिणीता, लगे रहो मुन्ना भाई, दबंग 2, थ्री इडियट्स आणि व्हेंटिलेटर यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.
राजकुमार हिरानी दिग्दर्शित आमिर खानच्या ‘3 इडियट्स’ चित्रपटात प्रोफेसरची भूमिका साकारून अच्युत पोतदार घराघरात पोहोचले. या सिनेमात ‘क्या बात है’ आणि ‘कहना क्या चाहते हो?’ हे त्यांच्या तोंडचे डायलॉग्स गाजले. आजही त्यांचे हे डायलॉग्ज सोशल मीडियावर मीम्ससाठी प्रचंड चर्चेत असतात.दरम्यान, पोतदार यांच्या पार्थिवावर आज (दि.१९ ) रोजी ( Achyut Potdar) ठाण्यात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.