Team MyPuneCity – उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता (12 th Exam result) बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेचा निकाल ९१ टक्के इतका लागला असून, परीक्षेला बसलेल्या १४ लाख विद्यार्थ्यांपैकी १३ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षीही दरवर्षीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे.
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा 96.740 टक्के लागला, तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा 89.46 टक्के लागला.
एकूण १५४ विषयांपैकी ३७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. याचा अर्थ या विषयांमध्ये परीक्षा देणारे सर्व विद्यार्थी पास झाले आहेत. तसेच, १९२९ कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालाची टक्केवारी घटली आहे. गेल्या वर्षी (12 th Exam result) बारावीचा निकाल ९३.३७ टक्के होता. यावर्षी तो ९१.८८ टक्क्यांवर आला आहे.
Pimpri Chinchwad: अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने चैत्रगौर हळदीकुंकू समारंभ उत्साहात साजरा
यंदाच्या १२ वीच्या परीक्षेत ७ लाख ५६ हजार २२६ मुले बसली होती. त्यापैकी ६ लाख ७६ हजार ९७२ म्हणजे ८९.५१ टक्के मुले उत्तीर्ण झाली. तर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या ६ लाख ६१ हजार ७४३ होती. त्यापैकी ९४.५८ टक्के विद्यार्थिनी यशस्वी झाल्या. मुलांच्या आणि मुलींच्या उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात तब्बल ५ टक्क्यांची तफावत असल्याने त्याचा परिणाम एकूण सरासरीवर झाला.
मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून निकाल पहायला मिळत आहे. गुणांची पडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी ६ मे ते २० मे पर्यंत अर्ज (12 th Exam result) करता येणार आहे.
Talegaon Dabhade : “हाती होते शून्य तरीही…” पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
Maharashtra 12th result 2025 division wise: विभागनिहाय निकालाची टक्केवारी –
विभाग- टक्केवारी
कोकण- ९६.७४
कोल्हापूर- ९३.६४
मुंबई- ९२.९३
छत्रपती संभाजीनगर- ९२.२४
अमरावती- ९१.४३
पुणे- ९१.३२
नाशिक- ९१.३१
नागपूर- ९०.६२
लातूर- ८९.४६